भ्रष्टाचार दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या ताज्या करप्शन पर्सेप्शन इंडेक्समध्ये भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी पावले उचललेल्या १८० देशांची सूची बनवण्यात आली आहे. यात भारत ८६ व्या, तर चीन ७८ व्या क्रमांकावर आहे.

यापेक्षा समान नागरी कायदा करा !

जोपर्यंत कुटुंबनियोजनाच्या संदर्भातील नियम बनवला जात नाही, तोपर्यंत आपण हम दो हमारे पांचचा संकल्प केला पाहिजे, असे विधान भाजपचे नेते विनीत अग्रवाल शारदा यांनी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केले.

हिंसाचार्‍यांवर कठोर कारवाई करा !

२६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी देहलीमध्ये आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता; मात्र यात मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून हिंसाचार करण्यात आला. यात दोघा शेतकर्‍यांचा मृत्यू झाला, तर १८ पोलीस घायाळ झाले.

ख्रिस्ती बिशपची धर्मांधता जाणा !

केरळमधील सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये चर्चचे समर्थन असलेल्या उमेदवाराला तिकीट देण्याची शिफारस बिशप जॅकब मनथोदाथ यांनी माकपचे राज्य सचिव कनम राजेंद्रन् यांना गोपनीय पत्र लिहून केली आहे.

ख्रिस्ती धर्मप्रचारकाचे खरे स्वरूप जाणा !

तमिळनाडू राज्यातील ख्रिस्ती धर्मप्रचारक पॉल दिनाकरन् यांचे निवासस्थान आणि कार्यालय मिळून २८ ठिकाणांवर आयकर विभागाने घातलेल्या धाडीतून १२० कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

निधर्मीवादी याचा विरोध कधी करणार ?

तिरुपत्तूर (तमिळनाडू) येथील एलापल्ली गावामध्ये हिंदूंच्या २५० वर्षे प्राचीन असणार्‍या अम्मान मंदिराच्या सर्व भिंतींवर आणि फरशांवर ख्रिस्त्यांचा क्रॉस रेखाटण्यात आला असून त्याला चर्चचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.

मंदिरांचे सरकारीकरण रोखा !

सरकार विमान वाहतूक आस्थापने, विमानतळे, कारखाने आदींचे खासगीकरण करते, तर हिंदूंची पवित्र मंदिरे नियंत्रणात ठेवते, हे समजण्याच्या पलीकडचे आहे, असा प्रश्‍न सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी केला आहे.

धर्मांध जावेद अख्तर यांचा हिंदुद्वेष जाणा !

गुजरात सरकारने ‘ड्रॅगन फ्रूट’चे नाव ते कमळासारखे दिसते म्हणून ‘कमलम्’ केले. पहिले शहरांची नावे आणि आता फळांची, काही दिवसांनी माणसांच्या अवयवांची नावेही पालटतील, अशी फुकाची टीका गीतकार जावेद अख्तर यांनी केली.

देशाला खरा इतिहास कधी शिकवणार ?

एन्.सी.ई.आर्.टी.च्या ७ वीच्या ‘अवर पास्ट – २’ या पुस्तकात देहलतील कुतुब मीनार ही वास्तू कुतुबुद्दीन ऐबक आणि इल्तुतमिश यांनी बांधल्याचे शिकवण्यात येत आहे; मात्र याविषयी एन्.सी.ई.आर्.टी.कडे कोणतेही पुरावे नसल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे.

चीनला जशास तसे उत्तर द्या !

१९८० च्या दशकापासून चीन सतत भारतीय भूभागांवर नियंत्रण मिळवत आहे. काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे संपूर्ण देशाला याची किंमत मोजावी लागत आहे, असा आरोप भाजपचे खासदार तापिर गाओ यांनी केला आहे.