सिंधु देशासाठी भारताने साहाय्य करावे !
पाकच्या सिंध प्रांतातील सान शहरात ‘स्वतंत्र सिंधु देशा’च्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. ‘आंतरराष्ट्रीय समुदायाने आमच्या स्वातंत्र्यलढ्यात हस्तक्षेप करावा’, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
पाकच्या सिंध प्रांतातील सान शहरात ‘स्वतंत्र सिंधु देशा’च्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. ‘आंतरराष्ट्रीय समुदायाने आमच्या स्वातंत्र्यलढ्यात हस्तक्षेप करावा’, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
मेरठ (उत्तरप्रदेश) येथील मवाना भागामध्ये गोहत्या रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांध कसायाच्या कुटुंबाने शस्त्रांसह प्राणघातक आक्रमण केले. यात एका महिला पोलीस शिपायाच्या गळ्यात फाशीचा दोर आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला.
आंध्रप्रदेशात गेल्या दीड वर्षापासून हिंदूंच्या मंदिरांवर होणारी आक्रमणे आणि मूर्तींची तोडफोड यांच्या प्रकरणात भाजप अन् तेलुगु देसम् पक्ष यांच्या २० हून अधिक कार्यकर्त्यांपैकी १५ जणांना अटक करण्यात आली आहे.
‘अॅमेझॉन प्राइम’ या ‘ओटीटी’ अॅपवरून १५ जानेवारीपासून प्रसारित झालेल्या ‘तांडव’ वेब सिरीजमधून भगवान शिवाचा अवमान करण्यात आला आहे. यात जे.एन्.यू. विश्वविद्यालयातील साम्यवादी विचारसरणीचे समर्थन करण्यासह देवतांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद घालण्यात आले आहेत.
एन्.सी.ई.आर्.टी.च्या इयत्ता १२वीच्या इतिहासाच्या पुस्तकात ‘मोगल आक्रमकांनी पाडलेल्या मंदिरांची नंतर त्यांनी डागडुजी केली’, असा उल्लेख करण्यात आला आहे; मात्र याचे कोणतेही पुरावे एन्.सी.ई.आर्.टी.कडे नसल्याचे उघड झाले आहे.
शेतकरी आंदोलनाविषयी सर्वोच्च न्यायालयातील याचिकांवरील सुनावणीच्या वेळी केंद्र सरकारने सांगितले की, या आंदोलनामध्ये खलिस्तान्यांनी घुसखोरी केली आहे. याविषयीचा गुप्तचर विभागाचा अहवाल सादर करू.
बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि कोलकाता उच्च न्यायालयातील अधिवक्ता कल्याण बॅनर्जी यांनी देवी सीतामाता यांच्याविषयी अनुद्गार काढल्यावरून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नवी देहली येथील लुटीयन्स भागातील औरंगजेब मार्ग लिहिलेल्या फलकावर ‘गुरु तेग बहादुर लेन’ लिहिल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ११ जणांना कह्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. अधिवक्ता अनुराधा भार्गव यांच्या नेतृत्वाखाली ही कृती करण्यात आली.
केरळमधील ‘मलंकारा ऑर्थोडॉक्स सीरियन चर्च’मध्ये कन्फेशनच्या (केलेल्या पापांची चर्चमध्ये पाद्य्रासमोर स्वीकृती देण्याच्या) विरोधात ५ ख्रिस्ती महिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून केली आहे.
भोपाळ (मध्यप्रदेश) येथील मुसलमान तरुणीवर प्रेम केल्यावरून तिच्या रईस खान या वडिलांनी हिंदु तरुण धर्मेंद्र यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाला विजेच्या उच्च दाबाच्या तारेने ‘शॉक’ दिला. त्याद्वारे त्यांचा मृत्यू अंगावर वीज कोसळून झाल्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला.