धर्मांधांची अंधश्रद्धा जाणा !

पलक्कड (केरळ) येथे मदरशामधील ३० वर्षीय शिक्षिकेने अल्लाला खुश करण्यासाठी स्वत:च्या ६ वर्षीय मुलाचा गळा चिरून त्याची हत्या केली. तिला असणार्‍या ३ मुलांपैकी हा सर्वांत लहान मुलगा होता. ही महिला आता गरोदर असल्याचीही माहिती पुढे आली आहे.

साम्यवाद्यांचा घटनाद्रोह आणि हिंदुद्वेष जाणा !

हिंदु ऐक्य वेदी संघटनेचे सरचिटणीस आर्.व्ही. बाबू यांना हिंदूंना हलाल प्रमाणित उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केल्यावरून केरळमधील माकपच्या आघाडी सरकारच्या पोलिसांनी अटक केली.

अशा मदरशांवर बंदी घाला !

उत्तरप्रदेशात मदरशांच्या नावाखाली सरकारी निधी लाटण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच काही ठिकाणी शिक्षकांच्या भरतीमध्ये घोटाळा झाला आहे. सरकारने विशेष अन्वेषण पथकाद्वारे यांची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.

जनतेची सुरक्षा वार्‍यावर !

भारतात १ लाख लोकसंख्येमागे केवळ १५६ पोलीस आहेत. याचाच अर्थ देशातील ६४१ व्यक्तींची सुरक्षा केवळ १ पोलीस कर्मचारी करत आहे, अशी माहिती ‘इंडिया जस्टिस रिपोर्ट २०२०’द्वारे समोर आली आहे.

आधी पाकव्याप्त काश्मीर परत करा !

जम्मू-काश्मीरच्या जनतेच्या इच्छा-आकांक्षा लक्षात घेऊन सन्मानजनक आणि शांततामय मार्गाने काश्मीर प्रश्‍नाचा तोडगा काढावा, असे पाकचे सैन्यदलप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी म्हटले आहे.

काँग्रेसची गुंडगिरी जाणा !

जलालाबाद (पंजाब) येथे निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या वेळी काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार दगफडेक झाली. या वेळी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंह बादल यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली.

अशांना कारागृहात डांबा !

आजचा हिंदु समाज हा पूर्णतः सडला असून भारतात मुसलमानांवर अन्याय होत आहे, अशी गरळओक अलीगड मुस्लिम विद्यापिठातील विद्यार्थी शरजील उस्मानी याने पुणे येथील एल्गार परिषदेत केली.

चीनचा बटीक झालेला पाक !

चीनने मला बलुची लोकांचे आंदोलन चिरडण्यासाठी, तसेच भारताचा प्रभाव नष्ट करण्यासाठी येथे तैनात केले आहे, असे विधान पाकचे सैन्यप्रमुख मेजर जनरल अयमान बिलाल यांनी केले आहे.

आतंकवाद्यांना धर्म असतो !

राजधानीत इस्रायलच्या दूतावासासमोर झालेल्या स्फोटाचे दायित्व जैश-उल्-हिंद या आतंकवादी संघटनेने स्वीकारले. ‘सर्वशक्तीमान अल्लाच्या कृपेने आणि साहाय्यामुळे हा स्फोट करण्यात आला’, असे तिने म्हटले आहे.

अशांना कठोर शिक्षा व्हावी !

प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर मोर्च्याच्या वेळी झालेल्या हिंसाचाराच्या वेळी पोलिसांच्या गोळीबारात १ शेतकरी ठार झाला, अशी अफवा पसरवल्याच्या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेसचे खासदार शशी थरूर, पत्रकार राजदीप सरदेसाई आदी पत्रकारांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.