पू. संदीप आळशी यांच्या सेवेत असतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला पू. संदीपदादा यांना अल्पाहार, जेवण आदी देण्याची सेवा करण्याची संधी मिळाली होती. या कालावधीत मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

इंग्लंड येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले आधुनिक वैद्य मिलिंद खरे यांना ‘निर्विचार’ हा नामजप करतांना आलेल्या अनुभूती !

प्रथम आकाश आणि त्यानंतर तुळस यांकडे पहात ‘निर्विचार’ हा नामजप करतांना माझ्या मनातील विचार लवकर थांबले, माझा श्वास संथ झाला आणि मला शांत वाटले.

‘सात्त्विक रांगोळ्या’ या ग्रंथातील रांगोळीमुळे लोकांमध्ये परिवर्तन होऊन त्यांनी गणेशोत्सवातील चुकीच्या गोष्टी बंद करणे

‘सात्त्विक रांगोळ्या’ या ग्रंथातील गणेशतत्त्वाची रांगोळी काढल्यावर लोकांनी रांगोळीचे कौतुक करणे आणि गुलाल अन् चुरमुरे टाकणे बंद करणे

(म्हणे) ‘मोदी शासनाच्या काळात विचार आणि पत्रकार स्वातंत्र्याचा र्‍हास झाला !’ – अधिवक्ता सुरेश भटेवरा, ज्येष्ठ पत्रकार

यावरून ‘हे साहित्य संमेलन मराठी भाषेच्या वृद्धीसाठी आहे कि राजकारण्यांवर टीका करण्यासाठी ?’, असा प्रश्‍न कुणाला पडल्यास त्यात चुकीचे काय ?

(म्हणे) ‘सध्याचा भारत गांधी यांचा नव्हे, तर गोडसे याचा !’ – मेहबूबा मुफ्ती

जे सत्य नाही, अशी विधाने करून लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न मेहबूबा मुफ्ती करू पहात आहेत. जर हा देश गांधी यांचा नसता, तर भारत पुन्हा अखंड भारत  झाला असता ! तसा तो अद्याप झालेला नाही, ही वस्तूस्थिती आहे.

नेरे (पनवेल) येथे श्री साईबाबा प्राणप्रतिष्‍ठा २० वा वर्धापनदिन सोहळा

या सोहळ्‍यात काकड आरती, अभिषेक, महिमा पारायण, श्री सत्‍यनारायणाची महापूजा, भजन, श्री साई बाबांची पालखी सोहळा, महाआरती, रात्री ८.३० वाजता ह.भ.प. महेश महाराज साळुंखे यांचे सुश्राव्‍य कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत.

शिरोडा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे समुद्रात बुडणार्‍या २ पर्यटकांना वाचवण्यात यश

शिरोडा येथील समुद्रात ४ डिसेंबर या दिवशी बुडणार्‍या मुंबई येथील दोघांना ‘सागर सुरक्षारक्षक’ संजय नार्वेकर आणि ‘राज स्पोर्ट’चे कर्मचारी यांनी वाचवले.

(म्हणे) ‘ती लहान मुल आहेत, ती जोशात येतात आणि उत्स्फूर्तपणे असे काम करून मोकळी होतात !’

असे राज्यकर्ते असणार्‍या देशात निरपराध्यांच्या हत्या होणार नाहीत, तर काय होणार ? याचा विचार करून जागतिक समुदायाने पाकला बहिष्कृत करणे, हाच एकमेव उपाय ! श्रीलंकेने आणि भारताने तरी हा निर्णय घेतला पाहिजे !

वेत्ये येथे गॅसवाहिनी टाकण्यासाठी चुकीच्या पद्धतीने चालू असलेल्या कामामुळे वाहनाला अपघात

विकासकामे करत असतांना ठेकेदार आस्थापनांना काही नियम आणि अटी घातलेल्या असतात कि नाही ? तसेच चालू असलेल्या कामांवर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जाते का ? असे प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होतात.