(म्हणे) ‘सध्याचा भारत गांधी यांचा नव्हे, तर गोडसे याचा !’ – मेहबूबा मुफ्ती

  • जे सत्य नाही, अशी विधाने करून लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न मेहबूबा मुफ्ती करू पहात आहेत. जर हा देश गांधी यांचा नसता, तर भारत पुन्हा अखंड भारत  झाला असता ! तसा तो अद्याप झालेला नाही, ही वस्तूस्थिती आहे. – संपादक
  • काश्मीरमध्ये आता जिहाद्यांवर काही प्रमाणात वचक बसल्याने मेहबूबा मुफ्ती यांना मुसलमानप्रेमी गांधी यांची आठवत येत आहे, हेच त्यांच्या या विधानातून लक्षात येते ! – संपादक
  • काश्मीरमध्ये आतंकवादी घुसवणार्‍या पाकला नष्ट करण्याची मागणी फुटीरतावादी का करत नाही ? – संपादक
पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती

नवी देहली – सध्याचा भारत गांधी यांचा नाही, तर नथुराम गोडसे याचा वाटत आहे. येथे लोकांना बोलण्याचे स्वातंत्र्यही नाही, असे विधान जम्मू-काश्मीरमधील ‘पीपल्स डेमोक्रेटिक पक्षा’च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी येथील जंतरमंतरवर झालेल्या एका आंदोलनाच्या वेळी बोलतांना केले. (लोकांना बोलण्याचे स्वातंत्र्य नसते, तर मेहबूबा मुफ्ती असे विधान करू शकल्या असत्या का ?  संपादक)

मेहबूबा मुफ्ती पुढे म्हणाल्या की, केंद्र सरकार भारताच्या जनतेसमोर जम्मू- काश्मीरमधील परिस्थिती शांततापूर्ण असल्याचे दाखवत आहे; मात्र प्रत्यक्षात येथे रस्त्यावर रक्ताचे पाट वहात आहेत. छोट्या छोट्या गोष्टींवरून लोकांवर आतंकवादीविरोधी कायदा थोपवले जात आहेत. देशाच्या जनतेसमोर ज्या ‘नया कश्मीर’चा प्रचार केला जात आहे, ते सत्य नाही. काश्मीरची परिस्थिती जो देशाच्या जनतेपुढे मांडू पहातो, त्याला ‘पाकिस्तानी’ म्हटले जाते. (काश्मीरची स्थिती मांडण्याच्या नावाखाली पाकिस्तानी धोरण जर कुणी पुढे रेटत असेल, तसेच भारतविरोधी भूमिका मंडत असेल आणि त्यामुळे जर त्याला कुणी ‘पाकिस्तानी’ म्हणत असेल, तर त्यात चुकीचे ते काय ? – संपादक)