माजी सरन्यायाधीश गोगोई यांच्याविरुद्धच्या लैंगिक छळाच्या आरोपाच्या अन्वेषणाची कार्यवाही बंद

गोगोई यांनी आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीची सिद्धता करण्यासह काही सूत्रांवर कठोर निर्णय घेतले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध काही कट शिजला असावा, या गुप्तवार्ता विभागाच्या संचालकांच्या पत्राचा न्यायालयाने या वेळी उल्लेख केला.

केरळमधून पुण्यात येणार्‍या सर्व प्रवाशांसाठी आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी अनिवार्य !

येथील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुणे महानगरपालिकेने १८ फेब्रुवारीपासून शहराच्या हद्दीत प्रवासांवरील निर्बंध वाढवले आहेत. पुणे महानगरपालिकेने केरळमधून पुण्यात येणार्‍या सर्व प्रवाशांसाठी आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी अनिवार्य केली आहे.

१८ फेब्रुवारी या दिवशी मुंबईत ७३६ कोरोनाबाधित रुग्ण आढलले, तर ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ५ हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या इमारती सील करण्याची सूचना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.

शासनाने वैधानिक विकास महामंडळ बंद करून विदर्भ-मराठवाडा येथील जनतेचा विश्‍वासघात केला ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, भाजप

तसेच १ मार्चपासून चालू होणारे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वीज देयकाच्या प्रश्‍नांसह अनेक सूत्रांच्या अनुषंगाने वादळी ठरणार आहे, असेही ते म्हणाले.  

अर्थसंकल्पीय अधिवेशन दीर्घकाळ चालवण्यासाठी आरोग्य विभागाकडून आठवड्याला ३ दिवसांची सुट्टी घेण्याचा पर्याय

यामुळे ४ दिवसांच्या कामकाजात कुणाला कोरोनाची लागण झाली असल्यास त्याची लक्षणे ३ दिवसांच्या सुट्टीच्या कालावधीत दिसून येतील. त्यानंतर पुढच्या आठवड्यात चाचणी केल्यास कुणाला कोरोनाची लागण झाली असल्यास स्पष्ट होईल, असे आरोग्य विभागाने सुचवले आहे.

जगभरात दहशत आणि हिंसा पसरवण्यात उच्चशिक्षितांचा सक्रीय सहभाग ! – पंतप्रधान मोदी

जगभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये दहशत पसरवणे आणि हिंसा घडवून आणणे यांमध्ये उच्चशिक्षित अन् व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेल्यांचा सक्रीय सहभाग वाढत चालला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्‍व भारती विद्यापिठाच्या दीक्षांत समारंभामध्ये म्हटले.

 नागपूर येथे २४ घंट्यांत ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू; ६४४ नवीन रुग्ण !

जिल्ह्यात २४ घंट्यांत ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर ६४४ नवीन रुग्णांची भर पडली आहे. या धोकादायक काळातही नागरिकांनी नियम न पाळल्यास जिल्ह्यात टाळेबंदी लागू करण्यात येईल, अशी चेतावणी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी १८ फेब्रुवारी या दिवशी येथे दिली आहे.

सहकार विभागाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांसह ६५ संचालकांना ‘क्लीन चीट’

वर्ष २०११ मध्ये रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेचे तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त केले होते. ऑगस्ट २०१९ मध्ये राज्य सहकारी बँकेतील या कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती.

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही पांगारे (जिल्हा सातारा) ग्रामस्थ बससेवेपासून वंचित

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही जनतेसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करू शकत नाहीत, हे प्रशासनासाठी लज्जास्पद आहे. बससेवा चालू करण्यासाठी प्रशासन आंदोलनाची वाट पहात आहे का ?

मनसे कार्यकर्त्यांनी इचलकरंजीत महावितरणचे कार्यालय फोडले

दळणवळण बंदी काळातील वीजदेयके पूर्णपणे माफ करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. याची कोणतीच नोंद न घेता काही दिवसांपासून महावितरणने प्रलंबित वीजदेयक ग्राहकांची विद्युत् जोडणी तोडण्याची मोहीम चालू केली आहे.