संभाजीनगर येथे ‘पी.एफ्.आय.’चा मोठा अड्डा !

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) संघटनेच्या माध्यमातून मुसलमान युवकांना जिहादी आणि धर्मांध यांचे धडे देऊन त्यांचे ‘ब्रेन वॉश’ करत असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘पी.एफ्.आय.’च्या विरोधात राज्यात चालू असलेल्या कारवाईनंतर अनेक कार्यकर्त्यांना चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले आहे.

ज्यांनी धान गायब केले, त्यांना पकडण्यात येईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

महाविकास आघाडी सरकारच्या काळात धानखरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. शासनाने खरेदी केलेले धान्य सापडलेच नाही. हे धान्य केवळ कागदावरच आहे. त्यामुळे ते शोधावे लागेल आणि ज्यांनी धान्य गायब केले, त्यांना धरावे लागेल, अशी चेतावणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ ऑक्टोबर या दिवशी येथे दिली.

दुष्प्रवृत्तींच्या निर्दालनासाठी धर्माचरण करून स्वतःतील देवीतत्त्व जागृत करा ! – कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती

या व्याख्यानांच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाचे महत्त्व, हिंदु धर्मात स्त्रीचे स्थान, सध्याची महिलांची स्थिती, पाश्चिमात्य संस्कृतीचे दुष्परिणाम, लव्ह जिहाद, धर्माचरण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

कोल्हापूर जिल्ह्यात हिंदुत्वनिष्ठ-धर्मप्रेमी यांच्या घरांवर, गावे आणि गल्ल्या यांमध्ये डौलाने फडकला भगवा ध्वज !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३ ते ५ ऑक्टोबर या कालावधीतील देशव्यापी ‘हर घर भगवा’ अभियानास ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. यात कोल्हापूर जिल्ह्यात हिंदुत्वनिष्ठ-धर्मप्रेमी यांच्या घरांवर, गावांमध्ये आणि गल्ल्यांमध्ये भगवा ध्वज डौलाने फडकला.

पारपत्र आणि व्हिसा सादर करण्याच्या न्यायालयाच्या आदेशामुळे वारंवार गुन्हा करणार्‍या नायजेरियाच्या नागरिकांना बसली चपराक !

न्यायालयाच्या आदेशानंतर १० मासांनी एखाद्या गुन्ह्यात गजाआड झालेले  नायजेरियाचे ५४ नागरिक त्यांना जामीन मिळूनही अधिकृत कागदपत्रे नसल्याने अजूनही न्यायालयीन कोठडीची शिक्षा भोगत आहेत.

भिवंडी येथे चोर्‍या करणारी टोळी अटकेत !

चोर्‍या करणाऱ्या टोळीकडून ८ लाख १७ सहस्र ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याकडून १६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. याविषयी पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुराज्याचा संकल्प करूया ! – सुधीर मुनगंटीवार, वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री

२ ऑक्टोबर या दिवशी गांधी जयंतीनिमित्ताने वर्धा येथे ‘वन्दे मातरम् ।’ अभियान आणि नदी महोत्सव यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला.

पाण्यासाठी योजना राबवण्यात मनापासून प्रयत्न करणारे देवेंद्र फडणवीस ! – डॉ. राजेंद्रसिंह राणा, विख्यात पर्यावरणतज्ञ

जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केले. ७५ नद्यांच्या परिक्रमा उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत बोलतांना डॉ. सिंह यांनी फडणवीसांच्या कामाची प्रशंसा केली.

गोवा राज्यातून महाराष्ट्र राज्यात मद्याची अवैध वाहतूक करणार्‍यांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई होणार  

विलंबाने घेतलेला निर्णय असला, तरी ‘हेही नसे थोडके !’

नाशिक येथील अंबड परिसरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यात पोलीस अपयशी !

वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस अपयशी ठरणे, हे चिंताजनक आहे. असे असेल, तर गुन्हेगारी कधीतरी अल्प होईल का ? यासाठी पोलिसांनी अभ्यास करून युद्धपातळीवर स्वतःहून उपाययोजना काढणे आवश्यक आहे.