मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी घेतला निर्णय

पुणे – श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सध्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. श्रावण मासात सुरक्षिततेच्या दृष्टीने गाभारा, मुख्य मंडप आणि मंदिर परिसर येथेे गर्दी होऊन भाविकांची असुविधा होऊ नये, दर्शन सुलभतेने व्हावे, तसेच कुठलीही अनुचित घटना घडू नये अन् मंदिराचे पावित्र्य राखले जावे यांसाठी भ्रमणभाषच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. यासमवेत छायाचित्रे काढणे किंवा चित्रफित काढण्यावरही बंदी घातली आहे. ‘भाविकांनी मुख्य मंडप आणि मंदिर परिसरात छायाचित्रे काढू नयेत, तसेच भ्रमणभाष बंद ठेवून सहकार्य करावे’, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. (हा निर्णय केवळ श्रावण मासापुरता मर्यादित न ठेवता कायमस्वरूपी करावा, अशीच भक्तांची अपेक्षा आहे ! – संपादक)
पुणे!
बारा ज्योर्तिलिंगांपैकी पुणे जिल्ह्यातील एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सध्या भाविकांची मोठी गर्दी होत आहे. अधिक श्रावण महिना सुरू असल्यामुळे ही गर्दी होत आहे. त्यानंतर सुरू होणाऱ्या श्रावणात ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर परिसरात मोबाइल वापराला…
— पवन/Pawan 🇮🇳 (@ThePawanUpdates) August 8, 2023
संपादकीय भूमिकाअसा स्तुत्य निर्णय सर्वच मंदिर व्यवस्थापकांनी घ्यावा ! |
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
उद्योगाच्या यशासाठी अध्यात्माची जोड आणि साधनेची आवश्यकता अनिवार्य ! – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योगसमूह