
नागपूर, ३० डिसेंबर (वार्ता.) – खत उत्पादक आस्थापने खतांची विक्री करतांना त्यासमवेत अन्य खते विकत घेण्याची वितरकांवर सक्ती करतात. त्यामुळे वितरकांकडूनही शेतकर्यांवर ही सक्ती केली जाते. हे रोखण्यासाठी खरेदीची सक्ती करणार्या खत उत्पादक आस्थापनांवर कारवाई करण्याची चेतावणी मंत्री शंभूराज देसाई यांनी सरकारच्या वतीने विधानसभेत दिली.
बुलढाणा शहरातील सागर कृषी केंद्रात डीएपी खतांची पिशवी घेतांना शेतकर्यांना वेगळी खते घेण्यासाठी सक्ती करण्यात आल्याची माहिती सभागृहात दिली.
या प्रकरणात ‘मे. सागर सिड्स ॲन्ड फर्टिलायझर’ या खत विक्रेत्याचा परवाना रहित करण्यात आला होता, तो पुन्हा पुर्ववत् करण्यात आला आहे. बोगस खतांमुळेही आत्महत्या होत आहेत. बोगस खते आणि बोगस किटकनाशके यांची एकाच वर्षात २-३ वेळा होत असल्यास याविषयी पडताळून करून निलंबनाची कारवाई केली जाईल, असे या वेळी शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.
संपादकीय भूमिकापरवाना रहित केलेल्या खत विक्रेता आस्थापनाचा परवाना परत पूर्ववत् केल्यावर त्याच्याकडून तोच गुन्हा परत होणार नाही, याची निश्चिती कोण देणार ? |
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १८.०७.२०२६)
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !