
नागपूर, २९ डिसेंबर (वार्ता.) – वर्ष २०४७ पर्यंत महाराष्ट्राच्या विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्रशासनाच्या ‘नीती’ आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘मित्र’ (महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्स्फॉर्मेशन) या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२३ पासून ही संस्था कार्यरत होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. शेवटच्या आठवडा चर्चेनंतर सभागृहात उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातून लाईव्ह https://t.co/dNViHMt1aJ
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 29, 2022
ही संस्था ‘थिंक टँक’ (वैचारिक दिशा देणे)प्रमाणे काम करेल. राज्याच्या विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही संस्था समन्वय साधेल. राज्याचा समतोल आणि सर्वसमावेशक विकास साध्य करण्यासाठी ही संस्थेचा मोठा उपयोग होईल. विदर्भाच्या विकासासाठीही याचा उपयोग निश्चित होईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
महामार्गांवरील फलकांवर ‘अहिल्यानगर’ आणि ‘छत्रपती संभाजीनगर’ नावे त्वरित लावावीत !
तिन्ही आरोपींना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
छत्रपती संभाजीनगर येथे आंतरजिल्हा शस्त्र तस्करीची यंत्रणा उद्ध्वस्त; १० आरोपींना अटक
दाबोळी येथे दीड कोटी रुपये किमतीचे पेट्रोल कह्यात
मुंबईतील पूर्व समुद्रकिनार्याचा पर्यटन केंद्र म्हणून विकास !
मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवणार्या २ जणांवर गुन्हा नोंद