(म्हणे) ‘ही भूमी अल्लाची असून येथून सर्व मूर्ती हटवल्या जातील !’ – अलीगढ विद्यापिठात धर्मांध मुसलमान विद्यार्थ्यांची धमकी

अलीगढ (उत्तरप्रदेश) – येथील अलीगढ मुस्लिम विद्यापिठातील मुसलमान  विद्यार्थ्यांनी बाबरी मशीद पाडली गेल्याचा ६ डिसेंबर हा ‘काळा दिवस’ म्हणून साजरा केला. या वेळी त्यांनी ‘ही भूमी अल्लाची असून येथून सर्व मूर्ती हटवल्या जातील’, अशा शब्दांत धमकी दिली. यासह या विद्यार्थ्यांनी ‘बाबरी मशीद होती, आहे आणि भविष्यातही राहील’, अशाही घोषणा दिल्या.

६ डिसेंबर २०२२ या दिवशी विद्यापिठाचा विद्यार्थी नेता महंमद फरीद याच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने मुसलमान विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन विद्यापीठ परिसरात निदर्शने केली. या वेळी तो म्हणाला, ‘‘बाबरी मशीद कधीच संपुष्टात येणार नाही आणि ती कायम राहील. एक दिवस अल्लाहच्या या भूमीतून सर्व मूर्ती हटवल्या जातील आणि केवळ अल्लाचे नाव राहील.’’

पोलिसांनी या प्रकरणाचे अन्वेषण करावे ! – भाजप

याविषयी अलीगड येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गौरव शर्मा म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने ६ डिसेंबर हा ‘काळा दिवस’ साजरा करण्यावर बंदी घातली आहे. यानंतरही अलीगढ विद्यापिठात हा दिवस साजरा करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचे अन्वेषण केले पाहिजे.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंना अशी उघड धमकी देऊन कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणार्‍यांना सरकारने आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !
  • अशी धमकी हिंदूंनी मुसलमानांना दिली असती, तर एव्हना पुरोगामी, काँग्रेसवाले, साम्यवादी, बुद्धीवादी आदी हिंदूंवर तुटून पडले असते. आता मात्र हे सर्व जण मूग गिळून गप्प आहेत !
  • विद्यार्थी दशेपासूनच इतका पराकोटीचा हिंदुद्वेष शिकवल्या जाणार्‍या विद्यापिठावर सरकार बंदी का घालत नाही ?