
मुंबई – पूरस्थितीत जीवितहानी होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी, तसेच जलसंपदा विभाग यांनी सावध राहून योग्य ती दक्षता घ्यावी. ‘एन्.डी.आर्.एफ.’च्या पथकांना सज्ज ठेवा. पूरस्थितीत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

१. चिपळूणमधील परिस्थितीकडे सातत्याने लक्ष ठेवावे. तेथील नागरिकांना वारंवार आवश्यक त्या सूचना देऊन सावध ठेवावे. रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनाही पूरस्थितीविषयी वेळीच सूचना द्यावी. नागरिकांच्या स्थलांतराची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मुंबई, ठाणे तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला. पूरग्रस्त नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवावे तसेच त्यांच्या राहण्याची, जेवण्याची सोय करण्याचे निर्देश यासमयी संबंधित यंत्रणांना दिले. pic.twitter.com/9U1hp7ON4S
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 6, 2022
२. कुंडलिनी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी या नद्यांतील पाणीही धोक्याच्या पातळीच्या जवळ पोचले आहे. जगबुडी, काजळी या नद्यांचे पाणी धोक्याच्या पातळीच्या वरून वहात आहे. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागांतील नागरिकांना वेळीच आवश्यक त्या सूचना देण्याचे निर्देश दिले आहेत.
३. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा करून पूरस्थितीतील जिल्ह्यांतील पालक सचिवांना संबंधित जिल्ह्यांत जाऊन पूरस्थितीची प्रत्यक्ष पहाणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
CJI In London: लंडन येथे भारताच्या सरन्यायाधिशांच्या कार्यक्रमात गोंधळ : भारतीय उच्चायुक्तालयाचा तीव्र संताप
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
अडचणी असल्या, तरी जलजीवन मिशन योजना पूर्ण करावीच लागेल !
गडचिरोलीतील खाण प्रकल्प रहित करावेत ! – आदित्य ठाकरे, नेते, ठाकरे गट
विधान परिषदेमध्ये महायुतीचे ५ उमेदवार बिनविरोध विजयी !