कलम ३७० रहित केल्यामुळे पाकने भारतासमवेतचा व्यापार केला होता बंद !
गेली ३ दशके पाकिस्तान भारतात आतंकवादी कारवाया करत असतांना भारताने पाकसमवेतचा व्यापार बंद केला नाही; मात्र पाकने तात्काळ बंद केला. आता पाक तो पुन्हा चालू करण्याचे म्हणत असला, तरी भारताने तो चालू करू नये. पाकला आतंकवाद थांबवण्यासाठी भाग पाडावे, असेच भारतियांना वाटते !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारतासमवेत व्यावसायिक नाते ही काळाची आवश्यकता आहे. यात दोन्ही देशांचा लाभ आहे, असे विधान पाकने केले आहे. काश्मीरला स्वतंत्र अस्तित्व प्रदान करणारे कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर पाकने भारतासमवेतचे सर्व व्यापारी संबंध संपुष्टात आणले होते. ‘काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू होत नाही, तोपर्यंत भारताशी व्यापर करणार नाही’, असे पाकने घोषित केले होते. ‘सध्या पाक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याने त्याला आता भारताशी व्यापारी संबंध प्रस्थापित करण्याची जाणीव होऊ लागली आहे’, असे म्हटले जात आहे.
Trade with India need of the hour, says Razak Dawoodhttps://t.co/6mvArbdzXS#india #Pakistan #Trade pic.twitter.com/KWyJFAJIgN
— Asian Peace Research (@asianpeace_org) February 21, 2022
पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांचे सल्लागार अब्दुल रजाक दाऊद यांनी म्हटले, ‘भारताशी व्यापार करणे कुणालाही लाभदायकच आहे. विशेषकरून पाकला लाभदायक आहे. त्यामुळे तो त्वरित चालू झाला पाहिजे. मी याच्या समर्थनात आहे.’
अमेरिका आणि इराण यांची एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव : हिंदु युवकाची आत्महत्या !
आग लावणार्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा ! – सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांची मागणी
कुपोषण निर्मूलनात रत्नागिरी जिल्हा परिषदेचा राज्यात आदर्श निर्माण करण्याचा संकल्प ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
Arunachal Pradesh Intrusion : चीन सैन्याने अरुणाचल प्रदेशामध्ये घुसखोरी करून भूमी बळकावली ! – आदिवासी समुदायाचा दावा
Sarla Bhatt Murder : काश्मीरमध्ये सरला भट्ट हत्येप्रकरणी ३६ वर्षांनंतर आतंकवाद्यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) !