पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांची मुक्ताफळे !
|

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारतात जे होत आहे, ते केवळ आमचे किंवा विशेषतः काश्मीरचेच नव्हे, तर हे सर्व भारतियांचे दुर्दैव आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ब्राह्मण्यवादी विचारसरणी भारतातील ५० ते ६० कोटी अल्पसंख्यांक समुदायाला बाजूला लोटत आहे. याचा भारतीय समाजावर गंभीर परिणाम होईल. इतिहास हेच दर्शवतो की, जेव्हा तुम्ही लोकांना वगळता किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करता, तेव्हा तुम्ही त्यांना कट्टरतावादी बनवता, असे विधान पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले. ते ‘इस्लामाबाद कॉन्क्लेव्ह २०२१’मध्ये बोलत होते.
#ImranKhan #ControversialStatement: #India में #RSS का ब्राह्मणवादी वर्चस्व अल्पसंख्यक समाज के लिए घातक#Brahmanismhttps://t.co/fBlisC2bpk
— Asianetnews Hindi (@AsianetNewsHN) December 10, 2021
खान पुढे म्हणाले की, दक्षिण आशियातील स्थिरतेसाठी काश्मीर हा मोठा धोका आहे. संपूर्ण दक्षिण आशियाला काश्मीरच्या सूत्राने बंधक बनवून ठेवले आहे. मला हे अत्यंत खेदाने सांगावे लागत आहे की, या प्रश्नाच्या संदर्भात भारत सरकारशी संवाद साधण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला; परंतु दुसर्या बाजूने कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही दूरभाष केला; परंतु हळूहळू आम्हाला याची जाणीव होऊ लागली की, ही आमची दुर्बलता मानली जात आहे. दुर्दैवाने आम्ही एका सामान्य भारत सरकारसमवेत नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी चर्चा करत होतो आणि या विचारधारेशी चर्चा करणे फार कठीण आहे. ज्यांना संघाची विचारसरणी ज्ञात आहे किंवा या संस्थेच्या संस्थापकांची वक्तव्य ऐकली आहेत, अशा लोकांशी चर्चा करणे खरेच कठीण आहे. आम्ही प्रार्थना करतो की, भारतात एक असे सरकार यावे, जे गंभीरतेने पाकिस्तानशी चर्चा करील.
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !