पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांची मुक्ताफळे !
|

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारतात जे होत आहे, ते केवळ आमचे किंवा विशेषतः काश्मीरचेच नव्हे, तर हे सर्व भारतियांचे दुर्दैव आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ब्राह्मण्यवादी विचारसरणी भारतातील ५० ते ६० कोटी अल्पसंख्यांक समुदायाला बाजूला लोटत आहे. याचा भारतीय समाजावर गंभीर परिणाम होईल. इतिहास हेच दर्शवतो की, जेव्हा तुम्ही लोकांना वगळता किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करता, तेव्हा तुम्ही त्यांना कट्टरतावादी बनवता, असे विधान पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले. ते ‘इस्लामाबाद कॉन्क्लेव्ह २०२१’मध्ये बोलत होते.
#ImranKhan #ControversialStatement: #India में #RSS का ब्राह्मणवादी वर्चस्व अल्पसंख्यक समाज के लिए घातक#Brahmanismhttps://t.co/fBlisC2bpk
— Asianetnews Hindi (@AsianetNewsHN) December 10, 2021
खान पुढे म्हणाले की, दक्षिण आशियातील स्थिरतेसाठी काश्मीर हा मोठा धोका आहे. संपूर्ण दक्षिण आशियाला काश्मीरच्या सूत्राने बंधक बनवून ठेवले आहे. मला हे अत्यंत खेदाने सांगावे लागत आहे की, या प्रश्नाच्या संदर्भात भारत सरकारशी संवाद साधण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला; परंतु दुसर्या बाजूने कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही दूरभाष केला; परंतु हळूहळू आम्हाला याची जाणीव होऊ लागली की, ही आमची दुर्बलता मानली जात आहे. दुर्दैवाने आम्ही एका सामान्य भारत सरकारसमवेत नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी चर्चा करत होतो आणि या विचारधारेशी चर्चा करणे फार कठीण आहे. ज्यांना संघाची विचारसरणी ज्ञात आहे किंवा या संस्थेच्या संस्थापकांची वक्तव्य ऐकली आहेत, अशा लोकांशी चर्चा करणे खरेच कठीण आहे. आम्ही प्रार्थना करतो की, भारतात एक असे सरकार यावे, जे गंभीरतेने पाकिस्तानशी चर्चा करील.
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला
India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत