लस घेतली तरच प्रवेश !

नाशिक – येथील ‘भुजबळ नॉलेज सिटी’मधील कुसुमाग्रजनगरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सज्ज झाली आहे. संमेलन अवघ्या २ दिवसांवर आले असतांना जगभरात धास्ती निर्माण करणार्या कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ विषाणूचे साहित्य संमेलनावरही सावट पसरले आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असणार्यांनाच संमेलनात प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. संमेलनाचे आयोजन आणि निर्बंध याविषयी पुन्हा विचारविनिमय चालू झाला आहे.
मराठी साहित्य संमेलनावरही ओमिक्रॉनचे सावट; मंडपात खुर्च्या पोहोचल्या आणि…https://t.co/KIxiMBgEML #nashik #MarathiSahityasammelan #Omicron
— Maharashtra Times (@mataonline) November 29, 2021
साहित्य संमेलनाच्या मुख्य सभामंडपाची क्षमता १४ सहस्र आहे; मात्र आयोजकांनी ती आता सुरक्षित अंतर पालनासह ७ सहस्रांवर आणण्याची सिद्धता चालू केली आहे. समवेतच किमान लसीचा पहिला डोस घेतलेल्यांना संमेलनात प्रवेश असेल. संमेलनस्थळीच डोस दिला जाणार आहे. साहित्य संमेलन आणि ‘ओमिक्रॉन’ विषाणू या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तातडीची बैठक बोलावली असून नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर संमेलनस्थळी कठोर निर्बंध घालण्याचे संकेत जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. शिवाय इतर महत्त्वाचे निर्णयही होऊ शकतात.
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
रत्नागिरीत आयोगाचे कामकाज तातडीने पर्यायी जागेतून चालू करावे ! – संजय वैशंपायन
अवैध दारूधंदेवाल्यांची माहिती न दिल्यास संबंधित प्रशासकीय कारभार्यांचे मानधन रोखणार !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
CJI In London: लंडन येथे भारताच्या सरन्यायाधिशांच्या कार्यक्रमात गोंधळ : भारतीय उच्चायुक्तालयाचा तीव्र संताप
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !