लस घेतली तरच प्रवेश !

नाशिक – येथील ‘भुजबळ नॉलेज सिटी’मधील कुसुमाग्रजनगरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सज्ज झाली आहे. संमेलन अवघ्या २ दिवसांवर आले असतांना जगभरात धास्ती निर्माण करणार्या कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ विषाणूचे साहित्य संमेलनावरही सावट पसरले आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असणार्यांनाच संमेलनात प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. संमेलनाचे आयोजन आणि निर्बंध याविषयी पुन्हा विचारविनिमय चालू झाला आहे.
मराठी साहित्य संमेलनावरही ओमिक्रॉनचे सावट; मंडपात खुर्च्या पोहोचल्या आणि…https://t.co/KIxiMBgEML #nashik #MarathiSahityasammelan #Omicron
— Maharashtra Times (@mataonline) November 29, 2021
साहित्य संमेलनाच्या मुख्य सभामंडपाची क्षमता १४ सहस्र आहे; मात्र आयोजकांनी ती आता सुरक्षित अंतर पालनासह ७ सहस्रांवर आणण्याची सिद्धता चालू केली आहे. समवेतच किमान लसीचा पहिला डोस घेतलेल्यांना संमेलनात प्रवेश असेल. संमेलनस्थळीच डोस दिला जाणार आहे. साहित्य संमेलन आणि ‘ओमिक्रॉन’ विषाणू या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तातडीची बैठक बोलावली असून नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर संमेलनस्थळी कठोर निर्बंध घालण्याचे संकेत जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. शिवाय इतर महत्त्वाचे निर्णयही होऊ शकतात.
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !