अपघातांमध्ये १ सहस्र ७६४ सैनिकांचा मृत्यू, तर ३२३ सैनिक हुतात्मा
|

नवी देहली – वर्ष २०१५ ते २०२० या काळात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सी.ए.पी.एफ्.च्या) ६८० सैनिकांनी आत्महत्या केल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत दिली. आत्महत्या केलेल्या सैनिकांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल (सी.आर्.पी.एफ्.) आणि सीमा सुरक्षा दल (बी.एस्.एफ्.) यांच्या सैनिकांचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त वेगवेगळ्या अपघातांमध्ये १ सहस्र ७६४ सैनिकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती राय यांनी दिली. या कालावधीत विविध चकमकींमध्ये ३२३ सैनिक हुतात्माही झाले.
680 committed suicides in CAPFs in last six years: Govt to RS https://t.co/AGkWVNqWwp
— TOI India (@TOIIndiaNews) August 4, 2021
आत्महत्येमागे सर्वांत प्रमुख कारण हे कौटुंबिक असून आर्थिक विवंचना आणि आजारपण यांना कंटाळूनही काही सैनिकांनी आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात आले आहे.
Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्यशासन सनातन संस्थेला साहाय्य करणार !
राजस्थानमध्ये वर्ष १९९६ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाचा निकाल सर्वाेच्च न्यायालयाकडून रहित
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
देहलीतील आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
मृत्यूंजय वीर आणि शौर्यचक्राचे मानकरी हवालदार पॅराकमांडो मधुसूदन सुर्वे !
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था