
नवी देहली – वर्ष २०३० कडे पहातांना मला जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात जगाचे नेतृत्व करू शकेल असा भारत दिसतो, असे विधान अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत रिचर्ड वर्मा यांनी केले. ‘जगातील २ सर्वांत मोठ्या लोकशाही (भारत आणि अमेरिका) एकत्र आल्यास पुष्कळ काही करू शकतात’, असेही ते म्हणाले. ते ‘जिंदाल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ बँकिंग अँड फायनान्स’ने आयोजित केेलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
रिचर्ड वर्मा यांनी सांगितले की, भारत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असून सर्वाधिक महाविद्यालयीन पदवीधर, सर्वांत मोठा मध्यम वर्ग, सर्वाधिक भ्रमणभाष आणि इंटरनेट वापरकर्ते भारतात वास्तव्य करतात. जगात सर्वांत मोठे सैन्यबळ असलेल्या सूचीत भारत तिसर्या क्रमांकावर आहे. सर्वांत मोठी लोकशाही असणार्या भारतात २५ वर्षांपेक्षा अल्प वय असणारे ६० कोटी लोक आहेत. आशियातील सर्वांत तरुण कर्मचारी भारतामध्ये आहेत. वर्ष २०५० पर्यंत भारताला त्याचा लाभ होत राहील.
Ex-US envoy says India may lead the world by 2030, lists areashttps://t.co/vA1S9AzhFI pic.twitter.com/m5zKm3rODt
— Hindustan Times (@htTweets) August 3, 2021
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
Champat Rai Resignation : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे त्यागपत्र
Dhanbad BCCL Job Murder : अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी वडिलांची हत्या घडवून आणणार्या मुलाला अटक
महाराष्ट्रात ८ प्रमुख शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी भाषा विकास केंद्र उभारणार !
‘म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये यापुढे दारूला अनुमती नाही ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री