
पुणे – महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रथमच अंतर्गत मूल्यमापन करून दहावीचा निकाल घोषित केला. राज्याचा निकाल ९९.९५ टक्के लागला असून ७५८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले तर ४८ विद्यार्थी शाळा आणि शिक्षकांच्या संपर्कात नसल्याने त्यांचे अंतर्गत मूल्यमापन झाले नाही. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे शंभर प्रतिशत असून राज्यातील ९५७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दहावीचा निकाल घोषित केला. कोरोनाची परिस्थिती न सुधारल्यामुळे राज्यशासनाच्या निर्णयानुसार अंतर्गत मूल्यमापन करून निकाल लावण्यात आल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
Corona : आंध्रप्रदेशात २० दिवसांत आढळले कोरोनाचे १२ नवीन रुग्ण !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने १५० गरजू मुलींना विनामूल्य सायकलवाटप
ठाणे येथे शैक्षणिक सहलीत ६० विद्यार्थ्यांना विषबाधा; चौकशीची मागणी !