गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची गोमंतकियांना विविध आमिषे
अशी आमिषे दाखवून लोकप्रतिनिधी जनतेला लाचार बनवतात. विनामूल्य मिळणार्या गोष्टीचे जनतेला कधीच मूल्य समजणार नाही. त्यामुळे ती विजेची बचत न करता कशीही वापरेल. जनतेला लाचार बनवून स्वतःचा स्वार्थ साधणारे राजकीय नेते देशद्रोहीच होत !

पणजी, १४ जुलै (वार्ता.) – ‘आम आदमी’ पक्षाचे राष्ट्रीय संयोजक तथा देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आप’ सत्तेवर आल्यास गोमंतकीय कुटुंबियांना प्रतिमाह ३०० युनिट वीज विनामूल्य देण्याची घोषणा येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केली, तसेच थकित वीजदेयके माफ करणार, २४ घंटे वीजपुरवठा करणार आणि शेतकर्यांना शेतीसाठी विनामूल्य वीज देण्याचीही घोषणा केली. देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या गोवा दौर्यावर आहेत.

ते पुढे म्हणाले, ‘‘केजरीवाल’ जे सांगतो, ते नेहमी करतो. गोव्यात अतिरिक्त वीज आहे; मात्र त्याचे वितरण हे महत्त्वाचे सूत्र आहे.’’ पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री केजरीवाल यांना पत्रकारांनी गोव्यातील कोळसा प्रदूषणाविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी यावर कोणतेही उत्तर दिले नाही.
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !
पुणे येथे अधिवक्ता एस्.के. जैन यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ !
पानशेत (पुणे) पूरग्रस्त सोसाट्यांचे प्रश्न ६५ वर्षांनंतरही प्रलंबित !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !