गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची गोमंतकियांना विविध आमिषे
अशी आमिषे दाखवून लोकप्रतिनिधी जनतेला लाचार बनवतात. विनामूल्य मिळणार्या गोष्टीचे जनतेला कधीच मूल्य समजणार नाही. त्यामुळे ती विजेची बचत न करता कशीही वापरेल. जनतेला लाचार बनवून स्वतःचा स्वार्थ साधणारे राजकीय नेते देशद्रोहीच होत !

पणजी, १४ जुलै (वार्ता.) – ‘आम आदमी’ पक्षाचे राष्ट्रीय संयोजक तथा देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आप’ सत्तेवर आल्यास गोमंतकीय कुटुंबियांना प्रतिमाह ३०० युनिट वीज विनामूल्य देण्याची घोषणा येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केली, तसेच थकित वीजदेयके माफ करणार, २४ घंटे वीजपुरवठा करणार आणि शेतकर्यांना शेतीसाठी विनामूल्य वीज देण्याचीही घोषणा केली. देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या गोवा दौर्यावर आहेत.

ते पुढे म्हणाले, ‘‘केजरीवाल’ जे सांगतो, ते नेहमी करतो. गोव्यात अतिरिक्त वीज आहे; मात्र त्याचे वितरण हे महत्त्वाचे सूत्र आहे.’’ पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री केजरीवाल यांना पत्रकारांनी गोव्यातील कोळसा प्रदूषणाविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी यावर कोणतेही उत्तर दिले नाही.
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !