भारतात इस्लाम येण्याआधी सर्वच हिंदू होते, हेच सत्य आहे; मात्र धर्मांध ते स्वीकारण्यास सिद्ध नाहीत, हेही तितकेच खरे !

हाजीपूर (बिहार) – बिहारचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री जमा खान यांनी त्यांचे पूर्वज ‘हिंदु राजपूत’ होते, असे सांगितले आहे. खान यांना पत्रकारांनी धर्मांतराविषयी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले.
हम राजपूत थे, हमारे बुजुर्ग बैसवाड़ा से आए थे। हमारे पूर्वज जयराम सिंह और भगवान सिंह थे। भगवान सिंह इस्लाम कबूल करके मुसलमान बन गए, जो हमारा खानदान है: जमा खान, बिहार सरकार में अल्पसंख्यक कल्याण मंत्री (09-07-2021) pic.twitter.com/IlAn1FNeWk
— ANI_HindiNews (@AHindinews) July 10, 2021
खान यांनी म्हटले की, जयराम सिंह आणि भगवान सिंह हे दोन भाऊ आमचे पूर्वज होते. ते बैसवाडातून आले होते. दोघे कैमूर भागात स्थायिक झाले. लढाई चालू झाल्यानंतर भगवान सिंह यांनी इस्लामचा स्वीकार केला. त्यामुळे भगवान सिंह यांच्या कुटुंबातील लोक मुसलमान आहेत; परंतु जयराम सिंह यांच्या वंशातील लोक आजही हिंदू आहेत. आमच्या कुटुंबातील अनेक लोक हिंदु राजपूत आहेत. हिंदु नातेवाइकांशी आजही सलोख्याचे संबंध आहेत. कुणाचेही बलपूर्वक धर्मांतर केले जाऊ शकत नाही. माझ्या डोक्यावर पिस्तुल लावले, तरी मी माझा धर्म पालटणार नाही. कुणी स्वेच्छेने धर्मपरिवर्तन करत असेल तर गोष्ट वेगळी आहे; मात्र कुणावरही धर्मांतरासाठी बळाचा वापर राज्यशासन होऊ देणार नाही.
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका