
मुंबई – राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १० प्रमुख संतांच्या पादुका बसगाड्यांनी नेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय संस्थानांनी नाईलाजाने स्वीकारला असला, तरी तो वारकरी संप्रदायाला मान्य नाही. त्यामुळे पायी वारीची परंपरा खंडित होऊ देऊ नका, अशी मागणी वारकर्यांच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. याविषयीचे निवेदन २१ जून या दिवशी राज्यपालांना देण्यात आले. या वेळी भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले, वारकरी महामंडळाचे अध्यक्ष आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे (पंढरपूर) सदस्य ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे, संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे (त्र्यंबकेश्वर) माजी अध्यक्ष ह.भ.प. संजय धोंडगे आदी उपस्थित होते.
पायी वारी खंडित करण्याचे पाप आघाडी सरकारने करू नये ! – आचार्य तुषार भोसले, प्रमुख, आध्यात्मिक समन्वय आघाडी, भाजप
महाराष्ट्राची शेकडो वर्षांची पायी वारीची परंपरा जी निजाम, मोगल आणि इंग्रज यांच्या काळातही खंडित झाली नाही, तिला सलग दुसर्या वर्षी खंडित करण्याचे पाप आघाडी सरकारने करू नये. सरकारने निर्बंधांसह ५० वारकर्यांना पायी वारीला अनुमती द्यावी. आमच्या पालख्यांसह ५० वारकर्यांना सुरक्षा देणे सरकारला जमत नसेल, तर त्यांनी केंद्रशासनाकडून सुरक्षा मागवावी.
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
ज्ञानोबा-तुकारामांचा गजर, विठ्ठल भेटीला निघाला सागर !