
वर्धा – जिल्ह्यातील आर्वी शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गटार योजनेचे काम चालू असल्याने रस्त्यांवर चिखल झाला आहे. सामान्य नागरिकांना ये-जा करतांना त्याचा त्रास होतो. ही परिस्थिती पावसाळ्यापूर्वी प्रशासनाच्या लक्षात आणून देऊनही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे, असा आरोप करत ‘प्रहार सोशल फोरम’ संघटनेच्या वतीने १६ जून या दिवशी चिखलात लोळत आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन संघटनेचे बाळा जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक मगर यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. या वेळी काळ्या मातीच्या जागी मुरूम रस्त्यावर टाकण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ‘याविषयी योग्य न्याय न मिळाल्यास अनोख्या पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी बाळा जगताप यांनी दिली आहे.
देहली आंदोलनावरून संसदेचे कामकाज स्थगित
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप