सातारा – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय रहित करून मराठा समाजावर अन्याय केला आहे. त्यामुळे सर्व गुंडेवाडी ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. या निर्णयाच्या निषेधार्थ खटाव तालुक्यातील गुंडेवाडी ग्रामस्थ यापुढील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकत असून कोणत्याही नेत्यास गावात प्रवेश दिला जाणार नाही, अशी चेतावणी गुंडेवाडी गावचे सरपंच शरद निकम यांनी दिली आहे.
सरपंच निकम पुढे म्हणाले की, आतापर्यंत सर्वच नेत्यांनी मराठा समाजाला केवळ झुलवत ठेवले. समाजाने आतापर्यंत शांततेत मोर्चे काढले, आंदोलने केली. यामध्ये अनेक मराठा बांधव हुतात्मा झाले. तरीही न्यायव्यवस्थेने समाजाचा विचार केला नाही, याचे आश्चर्य वाटते. या निर्णयामुळे मराठा समाजाचा भविष्यकाळ अंध:कारमय झाला आहे. मराठा आरक्षणासाठी सर्वांनी राजकीय गट-तट बाजूला ठेऊन संघटित झाले पाहिजे.

राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)
भूसंपादनाच्या प्रकरणी सा.बां. खात्याने ७१४ दिवस विलंबाने प्रविष्ट केलेली आव्हान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली