
कोल्हापूर – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशातील मध्यवर्ती आणि जिल्हा कार्यालयात शिक्षा भोगणार्या बंदीवानांची गर्दी न्यून करण्यासाठी बंदीवानांना तात्पुरत्या जामीन (पॅरोल)वर सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे कळंबा कारागृहातील ४५० बंदीवानांना लाभ मिळण्याची शक्यता आहे.
याविषयी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपिठाने प्रत्येक राज्य सरकार यांना उच्च समिती गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत. कमी गंभीर गुन्हेगार, घडलेल्या गुन्ह्याचे स्वरूप, बंदीवानाचे कारागृहातील वर्तन इत्यादी गोष्टींचा ही समिती तात्पुरत्या जामिनासाठी विचार करणार आहे. ‘याविषयी अद्याप सर्वोच्च न्यायालयाचा निकाल प्राप्त झाला नसून निकाल उपलब्ध होताच तात्काळ त्याची कार्यवाही केली जाईल आणि तसा अहवाल वरिष्ठ अधिकार्यांना दिला जाईल’, असे कळंबा कारागृहांचे अधीक्षक शरद बोबडे यांनी सांगितले.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव