गुढीपाडवा आपापल्या घरी अत्यंत साधेपणाने साजरा करा ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

मुंबई – गुढीपाडवा आणि नववर्ष यांच्या स्वागतासाठी सज्ज होत असतांना या वर्षी आपले राज्य, तसेच संपूर्ण देश एका अभूतपूर्व संकटातून जात आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत; मात्र नागरिकांच्या संपूर्ण सहकार्याविना हे कार्य होणे शक्य नाही. त्यामुळे नागरिकांनी शासनाला संपूर्ण सहकार्य करावे. गुढीपाडव्याचा मंगल सण आपापल्या घरी अत्यंत साधेपणाने साजरा करा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला केले आहे. गुढीपाडव्यानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा देतांना त्यांनी ‘घरी रहा आणि सुरक्षित रहा’, असा संदेशही दिला आहे.