श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी अर्पिलेली कृतज्ञतासुमने !

नैतिकतेत नम्रतेचा वास असतो. ज्‍या वेळी नम्रता कृतज्ञतेच्‍या भावात देवतेच्‍या चरणी समर्पित होऊ लागते, त्‍या वेळी मनोलयाला प्रारंभ होतो. कृतज्ञतेचा भाव जिवाला देवत्‍व प्रदान करतो.

रामनामामुळे पातक नष्‍ट झाल्‍याचे सिद्ध करून दाखवणारे श्री संत तुलसीदास !

६ जुलै २०२३ या दिवशी गोस्‍वामी तुलसीदास यांची ४०० वी जयंती आहे. त्‍या निमित्ताने..

गुरूंची आवश्‍यकता काय ?

आध्‍यात्‍मिक उन्‍नतीच्‍या मार्गात आपण स्‍वतःच प्रयत्न करू लागलो, तर आपल्‍यातील दोष आणि चुका यांमुळे आपली उन्‍नति होण्‍यास फार काळ लागतो; पण योग्‍य गुरूंच्‍या मार्गदर्शनाने १२ तासांचा मार्ग केवळ ४ तासांत आक्रमिता येतो.

‘गुरूंच्‍या संकल्‍पाने शिष्‍याची आध्‍यात्मिक प्रगती होणे’, हीच गुरुकृपा !

गुरुगीतेत स्‍पष्‍ट केले आहे, ‘श्री गुरु हेच अज्ञान नाहीसे करणारे ‘ब्रह्म’ आहेत.’ गुरूंच्‍या मार्गदर्शनानुसार जो भक्‍त, साधक अथवा शिष्‍य आचरण करील, त्‍याची साधना श्री गुरुच करवून घेतात. गुरु त्‍याला अनुभूती आणि प्रत्‍यक्ष स्‍वरूपात ज्ञान देऊन त्‍याचे अज्ञान दूर करतात.

गुरुप्राप्‍तीची खूण

‘ज्‍या वेळी गुरुशक्‍तीचा आपल्‍या अंतर्यामी प्रवेश झाल्‍याचा तुम्‍हाला अनुभव येईल, त्‍या वेळी तुम्‍हाला आपल्‍या गुरूंची ओळख पटेल. गुरु प्राप्‍त झाल्‍याची ती खूण आहे.’

गुरुपौर्णिमेला २ दिवस शिल्‍लक

ज्‍याप्रमाणे मुलाला बोलायला शिकवतांना प्रारंभी लहान शब्‍द शिकवतात, चालायला शिकवतांना हळूहळू चालवतात, तसेच गुरुही शिष्‍याला टप्‍प्‍याटप्‍प्‍याने हळूहळू शिकवतात.      

गुरुपौर्णिमेला ३ दिवस शिल्‍लक

मेघ हा सर्वत्र सारखाच वर्षाव करत असतो; पण सखोल जागी पाणी साठते आणि ताठरपणे उभे असलेले डोंगर कोरडेच रहातात. त्‍याचप्रमाणे संतांच्‍या ठिकाणी भेदभाव नाही. त्‍यांची दयादृष्‍टी सर्वांवर सारखीच असते; पण जो शुद्ध अंतःकरणाने त्‍यांच्‍या ठिकाणी लीन असतो, त्‍याला श्रद्धेनुसार यथोचित फलप्राप्‍ती होते.

प.पू. भक्तराज महाराज यांनी भक्तीभावाने भरवलेला पेढा प्रत्यक्ष ग्रहण करणार्‍या पांडुरंगाचे भक्तवात्सल्य !

इंदूर (मध्यप्रदेश) येथील थोर संत प.पू. भक्तराज महाराज एकदा त्यांच्या भक्तांसह पंढरपूर येथे गेले होते. रात्री १० वाजता प.पू. बाबा पांडुरंगाच्या समोर उभे राहिले. बाबांनी पांडुरंगाच्या गळ्यात हार घातला आणि पेढ्याच्या पुडीतील एक पेढा उचलून पांडुरंगाच्या मुखाला लावला. तेव्हा तो गायब झाला.

गुरुपौर्णिमेला ४ दिवस शिल्लक

जेव्हा भक्त शेकडो जन्म सात्त्विक, श्रद्धायुक्त, वैदिक पद्धतीने विधीपूर्वक ईशाची उत्तम आराधना करतात, तेव्हा (एखाद्या जन्मात) प्रभु ईश, म्हणजे शंकर, संतुष्ट होऊन साक्षात् गुरुरूपाने दृग्गोचर होतात. मग ते उत्तमप्रकारे तत्त्वबोध देऊन संसाररूपी दुःखसागरातून त्या शिष्यांचा उद्धार करतात

गुरुपौर्णिमेला ५ दिवस शिल्‍लक

बिंब-प्रतिबिंब न्‍यायाने शिष्‍याच्‍या मनातील, गुरूंनी काय करावे, याबद्दलच्‍या विचारांचे (बिंबाचे) प्रतिबिंब गुरूंच्‍या मनात उमटून त्‍यांना शिष्‍याचे विचार कळतात. ते विचार शिष्‍याच्‍या उन्‍नतीसाठी पोषक असल्‍यास गुरु त्‍यानुसार वागतात.