आपल्‍याला आलेल्‍या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे त्‍वरित लिहून देणे, ही साधकांची समष्‍टी साधना !

‘साधकांनी त्‍यांना आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती, तसेच शिकायला मिळालेली सूत्रे तत्‍परतेने पुढे लिहून द्यायला हवीत. ‘सनातन प्रभात’च्‍या माध्‍यमातून ही सूत्रे पुष्‍कळ मोठ्या समष्‍टीपर्यंत पोचून सर्वांनाच शिकायला मिळते. यामुळे वाचणार्‍यांना प्रेरणा मिळते आणि साधना अन् सेवा करण्‍याचा त्‍यांचा उत्‍साह वाढतो.

गुरुपादुका !

गुरूंच्‍या चरणांच्‍या ठिकाणी चार पुरुषार्थ म्‍हणजे ४ मुक्‍ती असतात; परंतु ज्‍या ठिकाणी शिव-शक्‍तीचे ऐक्‍य किंवा सामरस्‍य होते, त्‍यालाच श्रेष्‍ठ गुरुपादुका म्‍हणतात.

भक्‍ताबद्दल भगवंताचे विचार !

‘एकदा श्रीराम म्‍हणाला, ‘मी आपला अपमान तर सहन करून घेतो; परंतु माझ्‍या भक्‍ताचा अपमान माझ्‍याकडून सहन होत नाही. माझा कुणी सन्‍मान केला, तर मला तितका आनंद होत नाही, जितका माझ्‍या भक्‍ताच्‍या सन्‍मानाने मला आनंद होतो.’

उत्तरदायी साधकांनी भाव असलेल्‍या साधकांच्‍या भावजागृतीच्‍या प्रयत्नांचा आढावा तारतम्‍याने घ्‍यावा !

ज्‍या साधकांची भावजागृती होत नाही, त्‍यांना चिंतन सारणीनुसार प्रयत्न करण्‍याची दिशा द्यावी !’

उत्तरदायी साधकांनी ‘चांगली सेवा करणार्‍या साधकांचे व्‍यष्‍टी साधनेचे प्रयत्न होत आहेत ना ?’, याकडे लक्ष द्यावे !

‘एका जिल्‍ह्यातील एक साधक सेवा चांगली करायचे; परंतु स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या तीव्रतेमुळे अन्‍य साधकांनी सांगितलेल्‍या चुका त्‍यांना स्‍वीकारता यायच्‍या नाहीत. ‘अन्‍य साधकांनीच प्रयत्न करायला हवेत’, असे त्‍यांना वाटायचे.

गुरुपौर्णिमेचे वैशिष्‍ट्य

दसरा क्षत्रियांसाठी, दिवाळी वैश्‍यांसाठी, श्रावणी पौर्णिमा ब्राह्मणांसाठी, शिवरात्री शिवभक्‍तांसाठी, जन्‍माष्‍टमी कृष्‍णभक्‍तांसाठी विशेष आहे; परंतु गुरुपौर्णिमेचे पर्व, तर मानवमात्रांसाठी, सर्व देवता आणि दैत्‍यांसाठी विशेष आहे.

देव, दानव आणि मानव यांच्‍यासाठी गुरूंचे महत्त्व

‘भगवान श्रीकृष्‍ण गुरुपौर्णिमेचा उत्‍सव साजरा करतात, आपल्‍या गुरूंकडे जातात. देवतागण आपले गुरू श्री बृहस्‍पतींचे पूजन करतात. दैत्‍यगणही आपले गुरू श्री शुक्राचार्यांचे पूजन करतात.’

शिष्‍य डॉ. आठवले यांना येत असलेली आनंदाची अनुभूती ही सर्वोच्‍च अनुभूती असल्‍याचे प.पू. भक्‍तराज महाराज यांनी सांगणे

प.पू. भक्‍तराज महाराज : तुम्‍हाला आनंद जाणवतो का ?
शिष्‍य डॉ. आठवले : हो, नेहमीच !

संत किंवा उन्‍नत साधक यांच्‍याविषयी विकल्‍प बाळगून पाप ओढवून घेऊ नका !

संत किंवा उन्‍नत साधक यांच्‍याविषयी विकल्‍प येणे, हे पापकारक आहे. विकल्‍प येणार्‍या साधकाची आध्‍यात्मिक पातळी जितकी जास्‍त, तेवढे या विकल्‍पामुळे त्‍याला लागणारे पाप जास्‍त.