वीजदेयकांची थकबाकी नको !
विविध सरकारी योजना तोट्यात चालल्यामुळे त्यांचे खासगीकरण होऊ लागले आहे. ग्राहकांनी महावितरणला साहाय्य न केल्यास त्याचेही खासगीकरण झाल्याविना रहाणार नाही, अशी स्थिती आहे. ग्राहक आणि महावितरण यांनी स्वयंशिस्त लावून न घेतल्यास त्याचा गंभीर परिणाम सर्वांनाच भोगावा लागणार आहे.