गोवा सरकारने म्हादई अभयारण व्याघ्र क्षेत्र घोषित करावे ! – ‘म्हादई बचाव अभियान’

गोवा सरकारने म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित केल्यास म्हादई जलवाटप तंटा प्रकरणी न्यायालयात कर्नाटकच्या विरोधात आपली बाजू भक्कम झाली असती. या एकाच निर्णयाने म्हादई जलवाटप तंटासंबंधीचा प्रश्न पूर्णपणे निकालात निघाला असता !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तुष्टीकरण करणार्‍या काँग्रेसला भाजपसमवेत घेणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

तुष्टीकरणाच्या नीतीमुळे भारताचे विभाजन झाले. तुष्टीकरणामुळे २ देशांचा सिद्धांत मांडला गेला; परंतु त्यानंतरही तुष्टीकरण थांबलेले नाही. तुष्टीकरणाला भाजपमध्ये स्थान नाही.

गोसीखुर्द धरणाच्या तांत्रिक दोषयुक्त वितरिकेमुळे शेतपिके पाण्याखाली !

शेतकर्‍यांची होणारी आर्थिक हानी कोण भरून काढणार ?

पुणे येथील तत्कालीन उपायुक्त नितीन ढगे यांच्यासह त्यांच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा नोंद !

भ्रष्ट अधिकार्‍यांना कशाचाच धाक उरला नाही, हेच यावरुन सिद्ध होते. देशाला लागलेली ही भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्ट करण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक !

राज्यातील १० जिल्ह्यांत २ सहस्र ८५२ गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याने भरपावसात उघड्यावर अंत्यविधी !

जालना जिल्ह्यात ९७१ ग्रामपंचायती आहेत, यांपैकी ६९५ गावांमध्ये स्मशानभूमी आणि दफनभूमी उपलब्ध करून देण्यात आली आहे, तर २७० गावांमध्ये अजूनही स्मशानभूमी आणि दफनभूमी नाही. उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात.

… तर शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवले जाऊ शकते ! – श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य

कोणता पक्ष ‘शिवसेना’ याविषयी ३१ जुलै या दिवशी सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी यावर निर्णय झाला नाही, तर या निवडणुकींसाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही पक्षांना प्रतिकात्मक पक्षाचे नाव अन् चिन्ह द्यावे लागेल.

राजूर घाटात (जिल्हा बुलढाणा) महिलेवर सामूहिक बलात्कार 

जिल्ह्यात मलकापूर राज्य मार्गावरील राजूर घाटातून खडकीकडे चाललेल्या एका दांपत्याला ८ जणांच्या टोळक्याने अडवून त्यांच्याकडून ४५ सहस्र रुपये लुटले. तसेच पतीला मारहाण करून ३५ वर्षीय पत्नीवर चाकूचा धाक दाखवून ८ जणांनी बलात्कार केला.

श्री गणेश मूर्तीकारांनी मातीच्या मूर्ती निर्मितीस प्राधान्य द्यावे ! – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, सातारा

या वर्षी १९ सप्टेंबर या दिवशीपासून गणेशोत्सव चालू होत आहे. मूर्तीकारांची मूर्ती बनवण्याची लगबग चालू झाली आहे. गणेशोत्सवासाठी केंद्र सरकारने वर्ष २०२० मध्ये काही सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीची मूर्ती बनवली पाहिजे, अशी सूचना आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या एका मार्गिकेचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करू ! – रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

मुंबई-गोवा महामार्गाची सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी पहाणी केली. गणेशोत्सवापूर्वी महामार्गाच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण केले जाईल, तर डिसेंबरपर्यंत दोन्ही मार्गिकांचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे त्यांनी सांगितले.

३२ दिवसांचा प्रवास करत पालखी सोहळा आळंदीत परतला !

१३ जुलै या दिवशी एकादशीनिमित्त दुपारी पालखी नगरप्रदक्षिणा करून, तसेच हजेरी मारुति मंदिर येथे दिंड्यांची हजेरी घेऊन सोहळ्याची सांगता झाली.