
आळंदी (जिल्हा पुणे) – माऊलीनामाचा जयघोष करत माऊलींचा पालखी सोहळा ३२ दिवसांचा प्रवास करून पंढरपूरहून आळंदीत परतला आहे. आळंदी आणि पंचक्रोशीतील भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी पालखी सोहळा वडमुखवाडी, चहोली, धाकट्या पादुकामार्गे आळंदीत साडेसहा वाजता पोचला. येथील पालिका चौकात सोहळा आल्यावर भाविकांनी टाळ्या वाजवत माऊलीनामाचा गजर केला. पालिका चौकात पालखी रथातून खाली उतरवत आळंदीकरांनी खांद्यावर घेत मंदिरात आणली. मंदिरात प्रदक्षिणा घालून माऊलींच्या पादुका समाधीजवळ नेत आरती करण्यात आली. या वेळी मानकर्यांना नारळप्रसाद देण्यात आला. १३ जुलै या दिवशी एकादशीनिमित्त दुपारी पालखी नगरप्रदक्षिणा करून, तसेच हजेरी मारुति मंदिर येथे दिंड्यांची हजेरी घेऊन सोहळ्याची सांगता झाली.
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !