
आळंदी (जिल्हा पुणे) – माऊलीनामाचा जयघोष करत माऊलींचा पालखी सोहळा ३२ दिवसांचा प्रवास करून पंढरपूरहून आळंदीत परतला आहे. आळंदी आणि पंचक्रोशीतील भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी पालखी सोहळा वडमुखवाडी, चहोली, धाकट्या पादुकामार्गे आळंदीत साडेसहा वाजता पोचला. येथील पालिका चौकात सोहळा आल्यावर भाविकांनी टाळ्या वाजवत माऊलीनामाचा गजर केला. पालिका चौकात पालखी रथातून खाली उतरवत आळंदीकरांनी खांद्यावर घेत मंदिरात आणली. मंदिरात प्रदक्षिणा घालून माऊलींच्या पादुका समाधीजवळ नेत आरती करण्यात आली. या वेळी मानकर्यांना नारळप्रसाद देण्यात आला. १३ जुलै या दिवशी एकादशीनिमित्त दुपारी पालखी नगरप्रदक्षिणा करून, तसेच हजेरी मारुति मंदिर येथे दिंड्यांची हजेरी घेऊन सोहळ्याची सांगता झाली.
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
मोरगाव (पुणे) येथे ‘हरि ॐ तत्सत्’ परिवार, फोंडशिरस (ता. माळशिरस) यांच्याकडून ३३ आदर्श माता-पित्यांचा सत्कार !