
पिंपरी-चिंचवड – मावळमधील किन्हई गावाजवळ इंद्रायणी नदीत ५ मित्र पोहायला गेले होते. त्यांपैकी तिघांचा पोहतांना दम लागल्याने बुडून मृत्यू झाला आहे. हे सर्व जण पिंपरी-चिंचवड शहरातील घरकुल येथे रहाणारे आहेत. रोहित उपाख्य गौतम कांबळे, विशाल उपाख्य राज दिलीप आचमे आणि आकाश विठ्ठल कोरडे अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
रोहित, आकाश आणि विशाल हे इतर २ मित्रांसह इंद्रायणी नदीत पोहण्यास गेले होते. तिघेजण पाण्यात उतरले आणि दोघे नदीच्या कडेला बसले होते. तिघेही नदीत दिसत नसल्याने इतर दोघांनी आरडाओरडा केला. पोलीस, अग्नीशमन दल, एन्.डी.आर्.एफ्. आणि ग्रामस्थ घटनास्थळी पोचले. अथक प्रयत्नांनंतर २ घंट्यांनी त्यांचा मृतदेह मिळाला. धुळवडीच्या दिवशी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी मावळ वन्यजीव रक्षक गटही दाखल झाला होता.