मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना प्रश्न

मुंबई – कोरटकर तर चिल्लर आहे; पण छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध सर्वाधिक लिखाण पंडित जवाहरलाल नेहरूंनी केले आहे. पंडित नेहरू यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे लिहिले आहे, त्याचा निषेध तुम्ही करणार आहात का ? छत्रपतींच्या विरोधात सर्वाधिक लिहिणार्या नेहरूंचाही धिक्कार झाला पाहिजे. त्यांचा निषेध करण्याची हिंमत महाविकास आघाडी दाखवणार का ? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ मार्चला विधान परिषदेच्या सभागृहात केला. विरोधकांनी प्रशांत कोरटकर आणि अभिनेते राहुल सोलापूरकर यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप केल्याने फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली.
विरोधकांच्या टीकेला उत्तर देतांना फडणवीसांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणार्यांना सोडणार नाही. आम्ही १०० टक्के त्यांना कारागृहात टाकू; पण आमदार जितेंद्र आव्हाड काय बोलले आहेत ? औरंगजेब होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते. औरंगजेब बलाढ्य होता, महाराज ५ फुटांचे होते, हे त्यांचे वक्तव्य ‘रेकॉर्ड’वर आहे. त्याचा निषेध का होत नाही.
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ त्वरित रहित करावा – अधिवक्ता श्री. विश्वास पानसे, प्रमुख विश्वस्त, मार्तंड देवस्थान, जेजुरी
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन