मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना प्रश्न

मुंबई – कोरटकर तर चिल्लर आहे; पण छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध सर्वाधिक लिखाण पंडित जवाहरलाल नेहरूंनी केले आहे. पंडित नेहरू यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे लिहिले आहे, त्याचा निषेध तुम्ही करणार आहात का ? छत्रपतींच्या विरोधात सर्वाधिक लिहिणार्या नेहरूंचाही धिक्कार झाला पाहिजे. त्यांचा निषेध करण्याची हिंमत महाविकास आघाडी दाखवणार का ? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ मार्चला विधान परिषदेच्या सभागृहात केला. विरोधकांनी प्रशांत कोरटकर आणि अभिनेते राहुल सोलापूरकर यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप केल्याने फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली.
विरोधकांच्या टीकेला उत्तर देतांना फडणवीसांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणार्यांना सोडणार नाही. आम्ही १०० टक्के त्यांना कारागृहात टाकू; पण आमदार जितेंद्र आव्हाड काय बोलले आहेत ? औरंगजेब होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते. औरंगजेब बलाढ्य होता, महाराज ५ फुटांचे होते, हे त्यांचे वक्तव्य ‘रेकॉर्ड’वर आहे. त्याचा निषेध का होत नाही.
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !
पुणे येथे अधिवक्ता एस्.के. जैन यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ !
पानशेत (पुणे) पूरग्रस्त सोसाट्यांचे प्रश्न ६५ वर्षांनंतरही प्रलंबित !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !