जम्मू-काश्मीरमध्ये ३ दिवसांत ३ आतंकवादी आक्रमणे !
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या ३ दिवसांत ३ आतंकवादी आक्रमणे झाली आहेत. ९ जूनच्या सायंकाळी जम्मूतील रियासी येथील आक्रमणात ९ हिंदू ठार झाले होते. त्यानंतर आता डोडा जिल्ह्यातील सैन्याच्या एका तात्पुरत्या तळावर आतंकवाद्यांनी गोळीबार केला. या वेळी भारतीय सैन्याने प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात १ आतंकवादी ठार झाला, तर आतंकवाद्यांच्या गोळीबारात १ व्यक्ती घायाळ झाला. तिसर्या घटनेत कठुआ येथे झालेल्या चकमकीत २ आतंकवाद्यांना ठार मारण्यात आले; मात्र या वेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे २ सैनिक वीरगतीला प्राप्त झाले.
CRPF Jawan martyred, civilian injured after terrorist attack; 2 Militants also neutralised In Gunfight
📍Kathua Jammu and Kashmir
In order to destroy #terrorism India should wipe out #Pakistan, the root source of #terrorism !
जवान शहीद pic.twitter.com/9W6vjTEhJt
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 12, 2024
येथे ११ जूनच्या रात्रीपासून चकमक चालू होती. येथे ठार झालेल्या आतंकवाद्यांकडून ३० गोळ्या राहु शकणारी ३ मॅगझिन, २४ गोळ्या असलेली १ मॅगझिन, ७५ जिवंत काडतुसे, ३ ग्रेनेड, १ लाख रुपये, खाद्यपदार्थ, औषधे, पाकिस्तानात बनवलेले इंजेक्शन आदी जप्त करण्यात आले.
संपादकीय भूमिकाजम्मू-काश्मीर अद्यापही आतंकवादग्रस्तच आहे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते ! |

जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court