प्रेमाच्या जाळ्यात फसवून मुंबईत धर्मांधाकडून हिंदु युवतीची निर्घृण हत्या !

मृतदेह सुटकेसमध्ये भरून फेकला निर्जनस्थळी !

धर्मांध टॅक्सीचालक निजाम आणि पीडित पूनम क्षीरसागर

मुंबई – मानखुर्दमधील साठेनगर येथे रहाणार्‍या पूनम क्षीरसागर (वय २७ वर्षे) या हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळात फसवून निजाम नावाच्या धर्मांधाने तिची निर्घृण हत्या केली. निजाम नावाच्या टॅक्सीचालकाने कल्याण येथे नेऊन पाण्यात बुडवून पूनम हिची हत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. पोलिसांनी निजाम याला अटक केली असून त्याने हत्या केल्याची स्वीकृती दिली आहे.

पूनम मुंबईतील सॅन्डहर्स्ट रोड येथे कामाला जात होती. १८ एप्रिल या दिवशी निजाम याने पूनम क्षीरसागर हिला कल्याण येथे नेले. पूनम हिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. २ दिवसांपूर्वी मानखुर्द येथे निर्जनस्थळी एका सुटकेसमध्ये पूनम हिचा मृतदेह आढळून आला. पूनम हिला पाण्यात बुडवल्यानंतर निजाम तिला घेऊन कल्याण रुग्णालयात घेऊन गेला होता. रुग्णालयात तिला मृत घोषित केल्यानंतर निजाम याने तिचा मृतदेह घेऊन पलायन केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक अन्वेषणात आढळून आले आहे. याविषयी पोलिसांचे अन्वेषण चालू आहे. भाजपचे नेते आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मानखुर्द येथे जाऊन पूनम हिच्या पालकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

या प्रकरणात अन्य १५-१६ जणांचा सहभाग असल्याची शक्यता ! – मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री, मुंबई उपनगर

असे प्रकार सहन केले जाणार नाहीत. हिंंदूंमध्ये याविषयी आक्रोश आहे. ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी चेंबूर, अंधेरी येथेही अशा घडल्या आहेत. मातंग समाजाला लक्ष्य केले जात आहे. यास मुंबईत घुसलेले बांगलादेशी, रोहिंग्या मुसलमान उत्तरदायी आहेत.

या प्रकरणात निजाम हा एकटाच नाही, तर अन्यही १५-१६ जण सहभागी असल्याची शक्यता आहे. हा प्रकार ठाऊक असूनही त्यांनी निजाम याला लपवून ठेवले. त्यांच्याच्यावरही कारवाई व्हायला हवी.

संपादकीय भूमिका

  • हिंदु सहिष्णु असल्यामुळे त्यांनी सहस्रोंच्या संख्येने गावोगावी लव्ह जिहादच्या विरोधात शांततेने मोर्चे काढले; परंतु ना लव्ह जिहाद्यांवर त्याचा परिणाम झाला, ना प्रशासनावर ! अजून किती मुलींचे बळी गेल्यावर प्रशासन आणि हिंदू जागे होणार आहेत ?
  • हिंदु युवतीची हत्या करणार्‍या प्रत्येक लव्ह जिहाद्याला शरियतनुसार खड्ड्यात अर्धे पुरून त्याला दगड मारण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !
  • सध्या ९ राज्यांत धर्मांतरविरोधी कायदे आहेत; परंतु ते लव्ह जिहाद रोखण्यासाठी अजिबात पुरेसे नाहीत. वर्ष २०२४ मध्ये निवडून आल्यावर मोदी शासनाने देश स्तरावर लव्ह जिहादविरोधी कडक कायदा करावा, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !