किरकोळ वादातून तरुणाचा कान कापला !

अंबरनाथ येथे कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचे तीनतेरा !

प्रतीकात्मक छायाचित्र

अंबरनाथ – येथे किरकोळ कारणावरून वाद होऊन झालेल्‍या हाणामारीत नीरज या तरुणाचा कान चाकूने कापण्‍यात आला. तो चहाच्‍या टपरीवर आला होता. तेथे आलेल्‍या तिघांनी बसण्‍याच्‍या जागेवरून नीरजशी वाद घालण्‍यास आरंभ केला. वाद विकोपाला जाऊन तिघांनी टोळक्‍याने नीरजवर जीवघेणे आक्रमण केले. एकाने त्‍याच्‍यावर विटेने आक्रमण केले, तर दुसर्‍याने त्‍याला लाकडी फळी मारली आणि तिसर्‍याने नीरजचा कान कापला. यात नीरज गंभीर घायाळ झाला आहे. (भरदिवसा रस्‍त्‍यावर अशी हाणामारी होणे यावरून गुन्‍हेगारांना पोलिसांचे भय उरले नाही, हेच लक्षात येते ! – संपादक) या हाणामारीची संपूर्ण घटना सीसीटीव्‍हीत चित्रीत झाली असून घायाळ नीरजवर खासगी रुग्‍णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणी अद्यापही शिवाजीनगर पोलीस ठाण्‍यामध्‍ये गुन्‍हा नोंद झालेला नाही. (आरोपींना अटक कधी होणार ? – संपादक)