साधनेत तळमळ आणि देवाचे साहाय्‍य यांचे असलेले महत्त्व

पू. संदीप आळशी

‘आपण तळमळीने साधनेचे प्रयत्न केले की, पुढे देवच ‘पुढचे प्रयत्न कोणते करायचे ?’, हे आतून सुचवतो. आपण बुद्धीने ठरवलेल्‍या प्रयत्नांपेक्षा देवाने सुचवलेले प्रयत्न आपल्‍याला साधनेत पुढे जाण्‍यासाठी अधिक योग्‍य असतात. हे प्रयत्न केल्‍यामुळे आपली साधनेची तळमळ आणखी वाढते. असे चक्र चालू रहाते. यावरून आध्‍यात्मिक उन्‍नती होण्‍यासाठी साधनेत तळमळ आणि देवाचे साहाय्‍य यांचे असलेले महत्त्व लक्षात येते.’

– पू. संदीप आळशी (२०.२.२०२०)