त्रिपुरामध्ये यावर्षी आतापर्यंत ५२ रोहिंग्या घुसखोरांना अटक

आगरतळा (त्रिपुरा) – त्रिपुरामध्ये यावर्षी आतापर्यंत ५२ रोहिंग्या मुसलमान घुसखोरांना अटक करण्यात आली असून ही मोहीम चालूच रहाणार आहे, अशी माहिती त्रिपुराचे पोलीस उपमहानिरीक्षक मंचक इप्पर यांनी दिली. काही दिवसांपूर्वी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी त्रिपुरामधील दलाल घुसखोरांना साहाय्य करत असल्याचा आरोप केला होता.

मंचक इप्पर म्हणाले की, आमचे लक्ष घुसखोरांना साहाय्य करणार्‍या लोकांवर आहे. आम्ही त्यांना ‘सीमा दलाल’ म्हणतो. आम्ही ईशान्य भारतातील सर्व राज्यांशी समन्वय साधून काम करत आहोत.

संपादकीय भूमिका

भारतात घुसखोरी केल्यानंतर अशांना अटक करून पुन्हा मायदेशात पाठवण्यासह अशा प्रकारची घुसखोरीच होणार नाही, यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे !