
मुंबई, २६ जुलै (वार्ता.) –आळंदी तीर्थक्षेत्रातील इंद्रायणी नदीमध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जात आहे. आळंदी येथे येणार्या लाखो वारकर्यांना हे दूषित पाणी प्यावे लागते. इंद्रायणी नदीच्या तिरावरील आळंदी, पिंपळी, मूळी आदी गावांतील ग्रामस्थांनाही दूषित पाणी पुरवले जात आहे. इंद्रायणी नदीच्या प्रदूषणामुळे वारकर्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, अशी समस्या आळंदी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी २६ जुलै या दिवशी औचित्याच्या सूत्राच्या अंतर्गत विधानसभेत मांडली. महाराष्ट्र सरकारने ‘नमामि गंगा’ या अभियानाप्रमाणे ‘नमामि इंद्रायणी’ हे अभियान सरकारने घोषित केले आहे. त्यावर तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे, अशी मागणी या वेळी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली.
१ मास उलटूनही गोतस्करांवर कारवाई नाहीच ! – अवधूत धुमाळ, मानद पशूकल्याण अधिकारी
मुसलमानाने केलेल्या प्राणघातक आक्रमणात दुसरा मुसलमान गंभीर घायाळ
पुणे येथील ‘विबग्योर स्कूल’मधील ख्रिस्ती कर्मचार्याकडून हिंदु विद्यार्थिनीच्या धर्मांतराचा प्रयत्न !
अपकीर्तीची धमकी देत १७ लाख रुपयांची खंडणी उकळली : धर्मांध महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा नोंद
काँग्रेसशासित तेलंगाणामध्ये मध्यरात्री हटवला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा !
खराडीतील भोंदू राधामोहन मिश्रासह ८ जण कह्यात !