
मुंबई, १७ जुलै (वार्ता.) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्षातील काही आमदारांसह सरकारला पाठिंबा दिला. यामुळे पक्षात फूट पडून राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ अल्प झाल्याचे सांगत विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसने दावा केला; मात्र अजित पवार यांनी सरकारला पाठिंबा देऊन १५ दिवस होऊनही महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याविनाच विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे चित्र दिसत असले, तरी मागील २ दिवस शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीगाठी चालू आहेत. विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे ठेवण्यासाठी या भेटीगाठी नाही आहेत ना ? यातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसला शह देण्यात येत नाही ना ? असे प्रश्न निर्माण होत आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !
ससून रुग्णालयातील तज्ञांची चौकशी समिती स्थापन !