
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) – सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथे पर्यटनासाठी येणार्या सर्व पर्यटकांनी धबधब्याच्या ठिकाणी, आंबोली घाट परिसरात आणि तेथील वन विभागाच्या सीमेत कचरा करू नये, तसेच वन आणि पर्यावरण यांना बाधा पोचवणारे कोणतेही कृत्य करू नये. शासकीय जंगलात अवैधपणे प्रवेश केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक एस्. नवकिशोर रेड्डी यांनी दिली आहे.
येथे वन आणि पर्यावरण यांना बाधा येऊ नये, यासाठी येथे येणार्या पर्यटकांकडून ‘उपद्रव शुल्क’ वसूल करण्यात येणार आहे. हे शुल्क वसूल करतांना कोणत्याही व्यक्तीने अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर ‘शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणला’; म्हणून फौजदारी गुन्हा नोंद करण्यात येईल. कायदा आणि सुव्यवस्था याचा भंग झाल्यास पोलिसांचे साहाय्य घेतले जाईल, तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे रेड्डी यांनी सांगितले.
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.