वीर सावरकर उवाच

क्षात्रतेज, शस्त्रशक्ती ही समाजाच्या केवळ राजकीय अंगाचाच नव्हे, तर सार्‍या समाज जीवनाचा प्राण होय. क्षात्रधर्म दुबळा झाला, तर सारे धर्म, सारी शास्त्रे, सार्‍या कला, राष्ट्राचे जीवनचे जीवन बुडालेच म्हणून समजा. ज्याप्रमाणे पाया वाचून भव्य भवन, तसे सैन्यशक्तीवाचून साम्राज्य नुसत्या वार्‍याच्या वादळाने कोसळणारच !

(साभार : ‘सहा सोनेरी पाने’, सोनेरी पान पहिले : चाणक्य नीतीचा मूळ दंडक प्रथम शस्त्रबळ)