
‘वर्ष २०२२ मध्ये एका जिल्ह्यात नवरात्रीनिमित्त सनातनचे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनाला एका जिज्ञासू व्यक्तीने भेट दिली. त्या व्यक्तीशी संवाद साधतांना साधकांच्या असे लक्षात आले की, त्या व्यक्तीला ऐकायला आणि बोलायला येत नाही. असे असूनही सनातनचे ग्रंथ बघण्याची तिला पुष्कळ उत्सुकता आणि जिज्ञासा होती. संवाद साधता येत नसल्याने त्या व्यक्तीने तिच्या मनातील शंका भ्रमणभाषमध्ये लिहून प्रदर्शनात सेवा करणार्या साधकांना दाखवल्या. साधकांनी वहीत लिहून त्यांचे शंकानिरसन केल्यावर तिने काही ग्रंथ आणि लघुग्रंथ विकत घेतले. दैनिक ‘सनातन प्रभात’ची माहिती कळल्यावर ते जिज्ञासू दैनिकाचे वर्गणीदारही झाले.
त्या जिज्ञासूमध्ये अध्यात्माविषयी तीव्र जिज्ञासा आणि ज्ञान मिळवण्याची तळमळही होती. त्यामुळे त्यांनी लगेचच ग्रंथ खरेदी केले. ऐकणे आणि बोलणे यांना मर्यादा असूनही त्यांनी भ्रमणभाषच्या माध्यमातून स्वत:चे शंकानिरसन करून घेतले, हेही कौतुकास्पद आहे. अध्यात्मात ‘तळमळ’ आणि ‘जिज्ञासू वृत्ती’ या गुणांना अत्यंत महत्त्व आहे.
या उदाहरणातून सनातनचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे ‘जिज्ञासू हाच ज्ञानाचा खरा अधिकारी आहे !’, हे वचन किती सत्य आहे, हे लक्षात येते.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.२.२०२३)
सोलापूर येथील सेवाकेंद्रात गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीना नकाते (वय ६२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
हसतमुख आणि सर्वांशी सहजतेने जवळीक साधणार्या चि.सौ.कां. गुलाबी धुरी !
उत्साही आणि सेवेची तळमळ असलेले चि. संदीप गवंडी अन् इतरांना साहाय्य करणार्या आणि देवाच्या अनुसंधानात असलेल्या चि.सौ.कां. भाग्यश्री हडकर !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘आज जी काही सेवा करता येईल ती करा, उद्या इतके साधक असतील की, तुम्हाला सेवा करण्याची संधीही मिळणार नाही !’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्यासाठी नवीन प्रश्न विचारण्याची कारणे आणि त्यांचे होणारे लाभ