मराठवाड्यात ८४ कोटी ७५ लाख रुपयांची हानी !

मराठवाड्यामध्ये १ लाख २२ सहस्र १८ शेतकर्‍यांचे ६० सहस्र ४०२ हेक्टर भूमीवरील पिकांची हानी झाली. संपूर्ण मराठवाड्यात आतापर्यंत ८४ कोटी ७५ लाख रुपयांच्या हानीभरपाईचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले आहेत. संभाजीनगर, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, जालना या जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे शेतपीक आणि फळबागा यांची हानी झाली. संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यात एका व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झाला.