‘मी काही वर्षांपूर्वी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. तेथे रहात असतांना एकदा मी पहाटे ५ वाजता चालण्याचा व्यायाम करण्यासाठी आश्रमातून बाहेर गेलो आणि पाऊण घंट्याने आश्रमात परत आलो. दुपारनंतर मला परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग लाभला. तेव्हा आमच्यात झालेले संभाषण पुढे दिले आहे.


१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘व्यायाम केला नाही, तर शरीर चांगले ठेवण्यासाठी साधना व्यय होते’, असे सांगणे
परात्पर गुरु डॉ. आठवले : आज सकाळी तुम्हाला आश्रमाच्या बाहेर फिरायला जातांना पाहिले.
मी : माझ्या मनात बर्याच कालावधीपासून शंका आहे की, ‘सकाळी अशा प्रकारे फिरणे किंवा नंतर व्यायाम करणे’, हे देहबुद्धी जोपासण्यासारखे आहे का ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्ही व्यायाम केला नाही, तर शरीर चांगले ठेवण्यासाठी तुमची साधना व्यय होते. आम्ही ‘साधना व्यय न होता शरीर चांगले रहावे आणि परिणामकारक साधना करता यावी’, यासाठी इतकी औषधे घेतो; मात्र ‘१ घंटा व्यायाम करण्याची आवश्यकता असल्यास ४ घंटे फिरायला जाणे’, हे अपेक्षित नाही. साधनेच्या दृष्टीने शरीर चांगले रहावे; म्हणून नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.
गुरुदेवांनी सांगितलेले सूत्र लक्षात ठेवून मी नियमित आवश्यक तेवढा वेळ व्यायाम करतो. आता देवद आश्रमातील आम्ही काही साधक सकाळी ठरलेल्या वेळेत एकत्र येऊन सूर्यनमस्कार घालतो आणि प्राणायाम अन् आसने करतो.’
– श्री. अरुण डोंगरे (वय ७० वर्षे) सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.१०.२०२२)
असे नेते देशाचे कधी भले करू शकतील का ?
‘आपले खरे कुटुंब हे आपले साधक आहेत’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वचनाची साधिकेला आलेली प्रचीती !
राष्ट्रप्रेमी, धर्माभिमानी आणि इतरांना साहाय्य करणारे अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे मुंबई येथील श्री. मुंडाची वेदव्यास पै (वय ९१ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !
संत ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !