पिकांची हानी होणार !

संभाजीनगर – गेल्या काही दिवसांपासून शेतकरी वेगवेगळ्या संकटांमुळे मेटाकुटीला आलेला असतांनाच २४ जानेवारी या दिवशी रात्री ८ वाजता शहरासह जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार पाऊस पडला. त्यामुळे शेतकर्यांच्या शेतीची हानी होणार आहे. दिवसभर शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते.
जिल्ह्यातील गंगापूर, दहेगाव, शेंदूरवाडा, तर पैठण तालुक्यातील बिडकीन, लोहगाव, सोमपुरी आणि वाळूज या परिसरात काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दौलताबाद परिसरातही रिमझिम पाऊस झाल्याने अनेक परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. जिल्ह्यासह अनेक ठिकाणी रब्बीचा हंगामा चालू आहे. त्यातच पाऊस चालू झाल्याने रब्बी हंगामाला जोराचा फटका बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (१५.०६.२०२६)
टिटवाळा येथे भूमाफियांच्या टोळीकडून वृद्धेच्या घरात घुसून तोडफोड !
नसरापूर खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यात !
मंगळवेढ्यात खताच्या नावाखाली मिठाची विक्री !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !
उत्तरप्रदेशात वादळी वार्यासह पाऊस : ५ जणांचा मृत्यू