पिकांची हानी होणार !

संभाजीनगर – गेल्या काही दिवसांपासून शेतकरी वेगवेगळ्या संकटांमुळे मेटाकुटीला आलेला असतांनाच २४ जानेवारी या दिवशी रात्री ८ वाजता शहरासह जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार पाऊस पडला. त्यामुळे शेतकर्यांच्या शेतीची हानी होणार आहे. दिवसभर शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते.
जिल्ह्यातील गंगापूर, दहेगाव, शेंदूरवाडा, तर पैठण तालुक्यातील बिडकीन, लोहगाव, सोमपुरी आणि वाळूज या परिसरात काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दौलताबाद परिसरातही रिमझिम पाऊस झाल्याने अनेक परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. जिल्ह्यासह अनेक ठिकाणी रब्बीचा हंगामा चालू आहे. त्यातच पाऊस चालू झाल्याने रब्बी हंगामाला जोराचा फटका बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १८.०७.२०२६)
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे