नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांचे प्रतिपादन !

काठमांडू (नेपाळ) – मी भारताच्या विरोधात नाही. मी जेव्हा पंतप्रधान म्हणून निवडलो आणि राष्ट्रपतींच्या निवासस्थानातून बाहेर पडलो, तेव्हा सर्वप्रथम माझे भारताच्या राजदूतांनी अभिनंदन केले. त्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून माझे अभिनंदन केले. ते पहिले पंतप्रधान होते ज्यांनी माझे अभिनंदन केले, असे वक्तव्य नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले.
Exclusive: Not Against #India, Will Forget Old Disputes, Says #NepalPM #PushpaKamalDahal ‘#Prachanda‘
Read More: https://t.co/thCCjJB3hh
— ABP LIVE (@abplive) December 27, 2022
पंतप्रधान प्रचंड पुढे म्हणाले की, शेवटच्या वेळी मी जेव्हा भारतात गेलो होतो, तेव्हा मी पंतप्रधान मोदी यांच्याशी अनेक सूत्रांवर मनमोकळेपणाने चर्चा केली. नेपाळ आणि भारत यांच्यातील संबंध अधिक बळकट करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली पाहिजे. अशी अनेक सूत्रे आहेत, ज्यावर दोन्ही देशांनी एकत्र काम केले पाहिजे आणि याविषयावर भारताच्या नेत्यांशी आम्ही यापूर्वीच चर्चा केली आहे. मला वाटते की, दोन्ही देशांचे संबंध एका योग्य दिशेने पुढे गेले पाहिजेत.
संपादकीय भूमिका
|
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin