
कोल्हापूर – प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्था, कॉमन मॅन या संघटनेच्या पदाधिकार्यांनी १८ नोव्हेंबर या दिवशी जयंती नाल्यासह ६ नाल्यांमधील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि त्या संदर्भात तक्रारी केल्या. मोरेवाडी, पाचगाव, कळंबा या गावांतील विनाप्रक्रिया सांडपाणी जयंती नाल्यातून थेट पंचगंगेत मिसळत आहे. जयंती नाला बंधारा येथे सांडपाणी आल्यावर उपसा यंत्रणा अल्प पडत असल्याने हे सांडपाणी थेट पंचगंगेत जात आहे. यानंतर प्रदूषण मंडळाने महापलिकेचे पर्यावरण अभियंता आणि जलअभियंता यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे. यात ‘७ दिवसांत नदीत मिसळणारे सांडपाणी रोखा; अन्यथा कायदेशीर कारवाई का करू नये, याचा खुलासा करावा’, असे नमूद करण्यात आले आहे.
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी
मोरजी येथे घर पाडण्याच्या कारवाईच्या वेळी रहिवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न