(मजार म्हणजे इस्लामी पीर किंवा फकीर यांचे थडगे)

सासाराम (बिहार) – येथील रोहतास जिल्ह्यातील चंदन टेकडीवर महान मौर्य सम्राट अशोकाच्या शिलालेखावर मजार बांधण्यात आली आहे. देशभरात सम्राट अशोकाचे ६ ते ८ शिलालेख आहेत, त्यांपैकी केवळ एकच बिहारमध्ये आहे. या शिलालेखावर मजार उभारून आता चादर चढवली जाते.
एकेकाळी अखंड भारतावर (काबुल ते कन्याकुमारी) राज्य करणार्या सम्राट अशोकाचे २ सहस्र ३०० वर्षे जुने शिलालेख नष्ट केले जात आहेत. २ सहस्र ३०० वर्षे जुना वारसा अवघ्या २३ वर्षांत पुसला गेला आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने जिल्हा प्रशासनाला चंदन टेकडीवर चालू असलेली बांधकामे अवैध असून तेथील पूर्वस्थिती कायम ठेवण्यासाठी पत्रे लिहिली होती. वर्ष २००८ मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने दिलेल्या निर्देशांनुसार सम्राट अशोक शिलालेखाजवळील अतिक्रमण हटवण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांनी सासाराम उपजिल्हाधिकार्यांना दिला होता. तत्कालीन उपजिल्हाधिकार्यांनी मरकजी मोहरम समितीला कबरीची चावी प्रशासनाकडे सोपवण्याची सूचना केली होती; मात्र समितीने आदेशाचे पालन केले नाही. सध्या तेथे मोठी इमारत बांधण्यात आली आहे. (या ऐतिहासिक वारसास्थळी अवैध बांधकाम होण्यास उत्तरदायी असलेल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकार्यांवरही कठोर कारवाई करावी. यासह हे अवैध बांधकाम तातडीने हटवावे ! – संपादक)
जिहादियों का “लैंड जिहाद”
बिहार के सासाराम में सम्राट अशोक के शिलालेख पर बना दी मजार
जिहादियों ने भगवान बुध के शांति के संदेशों को भी नही बक्शा
अभी अगर ये हाल है तो सोचिए अगर इन जिहादियों की संख्या बढ़ी तो आगे पाकिस्तान जैसे हालात हिंदू के लिए यहाँ बन जायेगा pic.twitter.com/hBcsGjjV3W— ALOK JHA (@STVAlok) September 26, 2022
संपादकीय भूमिका
|
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
नाशिकमध्ये पहिल्याच पावसात खोदलेल्या रस्त्यांवर चिखल !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !