‘पी.एफ्.आय.’ने बंदच्या वेळी बसगाड्यांची तोडफोड केल्याचे प्रकरण

थिरुवनंतपूरम् (केरळ) – ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने (‘पी.एफ.आय.’ने) गेल्या २३ सप्टेंबरला पुकारलेल्या बंदच्या वेळी अनेक बसगाड्यांची तोडफोड केली. या हिंसाचारात केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ५ कोटी रुपयांची हानी झाली. ‘पी.एफ.आय.’ने ही हानीभरपाई द्यावी, अशी मागणी करणारी एक याचिका केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केरळ उच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे.
Kerala: KSRTC seeks compensation of Rs 5.06 crores from PFI for damaging buses, says 71 damaged buses won’t resume services soonhttps://t.co/hTvorfa94o
— OpIndia.com (@OpIndia_com) September 28, 2022
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) देशभरातील ‘पी.एफ्.आय.’च्या ठिकाणांवर धाडी टाकून त्याच्या नेत्यांना अटक केली होती. या अटकेच्या निषेधार्थ ‘पी.एफ्.आय.’ने राज्यव्यापी बंद पुकारला होता. या वेळी ‘पी.एफ्.आय.’च्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हिंसाचारात बसगाड्या आणि इतर सार्वजनिक मालमत्ता यांची मोठी हानी झाली होती. या प्रकरणी अधिवक्ता दीपू टंकन यांच्या माध्यमातून प्रविष्ट केलेल्या याचिकेत केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दावा केला आहे की, कोणतीही पूर्वसूचना न देता हा बंद पुकारण्यात आला होता. असा बंद पुकारणे, हे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन आहे.
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !