बलात्कार्‍यांना फाशीची शिक्षा देण्याचा कायदा झाल्यापासून पीडितांची हत्या करण्याच्या घटनांत वाढ !

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा दावा

बलात्कारात फाशीच्या शिक्षेच्या तरतुदीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे बेताल वक्तव्य !

नवी देहली – देहलीमध्ये काही वर्षांपूर्वी झालेल्या निर्भया सामूहिक बलात्काराच्या प्रकरणानंतर आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार कायद्यात पालटही करण्यात आला; मात्र त्यामुळे अशा घटनांमध्ये पीडित महिलांच्या हत्या करण्याच्या प्रकरणांत वाढ झाली आहे, असे विधान राजस्थानमधील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गेहलोक यांनी येथे प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले.

गेहलोत पुढे म्हणाले की, कुकृत्य केलेल्या पुरुषाला वाटते की, जर पीडितेला जिवंत ठेवले, तर ती त्याच्या स्वतःविरुद्धची (पुरुषाविरुद्धची) साक्षीदार बनेल. त्यामुळे तो तिला बलात्कार केल्यानंतर ठार मारतो. देशभरातून या प्रकरणांत जी काही माहिती मिळाली आहे, त्यातून असेच दिसून येत आहे. हे धोकादायक आहे.